अमरावती : महायुतीत अमरावती लोकसभा मतदारसंगात लोकसभा निवडणुकीत अनेक नाट्यमय घडामोडी बघायला मिळाल्या. सुरूवातीला अमरावतीची जागा शिवसेना शिंदे गटाला जाईल, अशी खात्री व्यक्त करण्यात येत होती. मात्र त्या जागेवर भाजपने दावा सांगितला. यातच अपक्ष खासदार असलेल्या नवनीत राणा या देखील इच्छूक होत्या. त्यानंतर भाजपने नवनीत राणा यांना कमळाच्या चिन्हावर उमेदवारी दिली. राणांचा महाविकास आघाडीसह बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचा देखील मोठा विरोध होता. तर शिवसेना शिंदे गटात असलेल्या अनंत अडसुळांनी राणांच्या उमेदवारीवर नाराजी व्यक्त केली होती. यातच आता राणांचा पराभव निश्चित आहे. असं विधान अनंत अडसुळ यांनी केलं आहे.
हेही वाचा…पुणे अपघातावर अजित पवारांनी केलं मोठं विधान, सुनील टिंगरेंच्या अडचणी वाढणार ?
पाच वर्षात त्यांनी एकही काम केलेलं नाही. त्यामुळे राणांचा पराभव निश्चित आहे. काम नाही परंतु नाटकं करण्याचं काम केलं आहे. कुणाच्याही घरी जायचं अन् पोळी लाटायचं काम त्यांनी केलं आहे. त्यांनी त्यांच्या घरी एकदा नवऱ्यासाठी, मुलांसाठी तरी पोळी लाटली आहे का ? अशा नाटकांची चीड लोकांमध्ये भयंकर होती. त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित आहे. असेही शिवसेना नेते अनंत अडसुळ यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“आमची लायकी निवडून येणारी नसली तरी तुम्हाला पाडण्याची लायकी नक्कीच आहे”
महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणं हे महायुतीच्या सर्वच नेत्यांचं कामचं आहे. गजानन किर्तीकर यांचं विधान आणि त्याआधारावर घेतलेली भूमिका महायुतीच्या यातीधर्माला छेद देणारी आहे. त्याचा विरोध अन् निषेध करतो असं भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटले होते. गजानन किर्तीकर यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील असेही शेलारांनी म्हटलं. त्यावर गजानन किर्तीकर म्हणाले की, माझ्या मुलाला मी मदत करू शकलो नाही, याची खंत आहे. यात त्यांचं काय चुकलं ? खंत यात अर्थ स्पष्ट होतो की, त्यांनी त्यांच्या मुलाचं काम केलेलं नाहीय.
मी आता निवृत्तीच्या मार्गावर असेन, तर माझा मुलगा त्या मतदारसंघात मी स्वत: जाऊन आलो आहेत. त्यामुळे अशी परिस्थिती अथवा काही मला अढळलं नाही. यांना कुठे शोध लागला ? त्यामुळे शेलारांनी आधी पुरावे द्यावेत अन् मग आरोप करावेत असे अडसुळांनी म्हटलंय. महायुतीत असल्याची जाण देखील त्यांनी ठेवायला हवी. असं म्हणत त्यांनी शेलारांना सुनावलं.
READ ALSO :
हेही वाचा..जनतेला दुष्काळाचे चटके, मात्र ‘या’ ५ पालकमंत्र्यांना दुष्काळाची चिंता नाही ?
हेही वाचा…“५० हजार कोटींचा गेल प्रकल्पही गेला,” अंबादास दानवेंचा केंद्रावर हल्लाबोल
हेही वाचा…“फिर से दिखाऊंगा सडक पे खेल,” बिल्डपुत्राचा माज, अपघातानंतर रॅपमधून केली शिवीगाळ