बीड : गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच गाजला. यातच बीडमध्ये महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी याविरोधात भूमिका घेतल्याने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील नाराज झालेत. याचा निवडणुकीत देखील पंकजा मुंडे यांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातच आता जरांगे पाटलांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधला आहे.
जरांगे पाटील म्हणाले की, त्यांचेच लोक त्यांना पाडणार आणि मराठ्यांचे नाव घेणार. मतदानापर्यंत मी आणि माझा समाज चांगला होता, मात्र, त्यानंतर आम्ही वाईट अशी तुमची नियत झाली आहे. त्यामुळे सगळ्यांनी शांत रहा, फक्त एक महिनाभर शांत रहा. काहीजण म्हणतात की, निवडणूक झाल्यावर बघू, मतदान झाल्यावर बघू. आता कोण काय करतो ? ते आम्ही पाहून घेऊ असा इशारा देखील त्यांनी दिलाय.
हेही वाचा…पुणे अपघातावर अजित पवारांनी केलं मोठं विधान, सुनील टिंगरेंच्या अडचणी वाढणार ?
या लोकसभेच्या निवडणुकीच्या गुलालमध्ये आम्हाला आनंद नाही. आमच्या लेकराचे कल्याण करण्यासाठी आरक्षणाचा गुलाल आम्हाला हवा आहे. एकजुट फुटू देऊ नका. जात मोठी करायची आणि जातीचे लेकर मोठे करायचे आहे. सगेसोयऱ्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मागे हाटत नाही, फक्त तुम्ही एकजूट फुटू देऊ नका. असेही त्यांनी आवाहन केलंय.
दरम्यान, माझ्या मराठ्यांच्या माणसाला कोणाकडून धक्का लागता कामा नये. पुन्हा असे म्हणून नका की, आम्ही तिकडे का निघालो, मी एक महिना शांत बसणार, पण या महिन्यात काही झाले तर आम्हालाही गुंडगिरीचे चांगले अड्डे माहित आहेत. असाही इशारा त्यांनी दिलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“पाच वर्षात एकही काम नाही, राणांचा पराभव निश्चित”, अनंत अडसुळांचा मोठा दावा
हेही वाचा..जनतेला दुष्काळाचे चटके, मात्र ‘या’ ५ पालकमंत्र्यांना दुष्काळाची चिंता नाही ?
हेही वाचा…“५० हजार कोटींचा गेल प्रकल्पही गेला,” अंबादास दानवेंचा केंद्रावर हल्लाबोल
हेही वाचा…“फिर से दिखाऊंगा सडक पे खेल,” बिल्डपुत्राचा माज, अपघातानंतर रॅपमधून केली शिवीगाळ