मुंबई : लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या चार जागांसाठीच्या निवडणुक कार्यक्रमाची नव्याने आता घोषणा करण्यात आली असून यात दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदारसंघासाठी ही निवडणूक होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात निवडणुकांचा धुराळा उडणार आहे.
हेही वाचा…“पाच वर्षात एकही काम नाही, राणांचा पराभव निश्चित”, अनंत अडसुळांचा मोठा दावा
मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघ तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाची घोषणा करण्यात आली आहे. आता नव्या वेळापत्रकानुसार या निवडणुकांसाठी २६ जून रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल येत्या ०१ जूलै रोजी लागणार आहे. यासाठी ३१ मे ते ०७ जुन पर्यंत उमेदवारांना आपला अर्ज भरता येणार आहे. तर १० जून रोजी अर्जाची छानणी तर १२ जुनपर्यंत आपला उमेदवारी अर्ज माघे घेता येणार आहे.
हेही वाचा..जनतेला दुष्काळाचे चटके, मात्र ‘या’ ५ पालकमंत्र्यांना दुष्काळाची चिंता नाही ?
दरम्यान, मुंबई पदवीधर मतदारसंघातून संजय पोतनीस तर कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे यांची मुदत ०७ जुलै रोजी संपत आहे. तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघातून कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदारसंघातून किशोर दराडे यांचीही मुदत संपणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“गृहमंत्री महोदय, गाडीखाली कुत्रं नाही तर जीवंत माणसं चिरडली जातायेत”
हेही वाचा…“पोलिस कर्मचाऱ्याचा पबमधला फोटो ट्विट करत धंगेकरांचा पोलिसांवर निशाणा,” कारवाई करा अन्यथा…
हेही वाचा…गावाच्या पारावर राजकारणासाठी गेला जीव, कोण जिंकणार ? वाद झाला अन्…