पुणे : कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातावरून कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. धंगेकर यांनी थेट पोलीस आयुक्तांवरच आरोप करत त्यांची तातडीने बदली करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. त्यासाठी धंगेकर यांनी पोलिस आयुक्तालयासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. अशातच आता पोलिस स्टेशनमध्ये काय काय सुरू आहे, त्यासंदर्भात ट्विट करण्यास सुरूवात केलीय. त्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हेही वाचा…“फिर से दिखाऊंगा सडक पे खेल,” बिल्डपुत्राचा माज, अपघातानंतर रॅपमधून केली शिवीगाळ
रवींद्र धंगेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये असं म्हटलंय की, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छित आहे. कल्याणीनगर अपघातानंतर तपासात अक्षम्य चुका होऊन देखील पुणे शहाराचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना अजूनही कोणी दोषी आहेत असे वाटत नाही. अर्थात जो स्वत:च बिल्डरच्या पाकिटावर काम करत आहे. तो कसा कुणावर कारवाई करणार ? असा सवाल धंगेकरांनी केलाय.
तसेच आजपासून तुम्हाला दररोज एक पोलिस स्टेशनवर सुरू असलेल्या गैर-कारभाराची कथा पाठवणार आहे. मुंढवा पोलिस स्टेशन हे फक्त ३ कर्मचारी चालवत आहेत. त्यापैकी निलेश पालवे, काळे हे कॉन्स्टेबल सर्व पब्स, हॉटेल येथून हप्ते गोळा करण्याचे काम करत आहेत. सोबत एक फोटो जोत आहेत. ज्यात हे वसुली कॉन्स्टेबल वॉटर्स नावाच्या पबमध्ये पार्टी करतांना दिसून येत आहेत.
यातच आम्हा पुणेकरांच्या वतीने आपणासं विनंती आहे की पुणे बिघडविणाऱ्या या पोलिस कॉन्स्टेबलची तातडीने चौकशी करत यांना निलंबित करा, अन्यथा ४८ तासात यांचे इतर व्हिडीओ देखील असेच ट्विट करण्यात येतील. असा इशारा धंगेकर यांनी दिला आहे.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो , कल्याणीनगर अपघातानंतर तपासात अक्षम्य चुका होऊन देखील पुणे शहराचे पोलीस कमिश्नर अमितेश कुमार यांना अजूनही कोणी दोषी आहेत असे वाटत नाही. अर्थात जो स्वतःच बिल्डरच्या पाकिटावर काम करतोय तो कसा कुणावर… pic.twitter.com/GP7uIC0JTk
— Ravindra Dhangekar Official (@DhangekarINC) May 24, 2024
READ ALSO :
हेही वाचा…गावाच्या पारावर राजकारणासाठी गेला जीव, कोण जिंकणार ? वाद झाला अन्…
हेही वाचा…“पाच वर्षात एकही काम नाही, राणांचा पराभव निश्चित”, अनंत अडसुळांचा मोठा दावा
हेही वाचा..जनतेला दुष्काळाचे चटके, मात्र ‘या’ ५ पालकमंत्र्यांना दुष्काळाची चिंता नाही ?
हेही वाचा…“५० हजार कोटींचा गेल प्रकल्पही गेला,” अंबादास दानवेंचा केंद्रावर हल्लाबोल