पुणे : पुण्यातील कल्याणीनगर येथील घटना घडल्यानंतरच्या दिवसापासून त्याकडे माझं लक्ष होतं. कारण नसतांना या प्रकरणामध्ये पालकमंत्र्यांचे लक्ष नसल्याचे सांगितलं जात आहे. अशा प्रकारे गैरसमज समाजामध्ये पसरवलं जात आहे. सकाळपासून मंत्रालयात काम करत असतो. त्यामुळे हे प्रकरण अतिशय गंभीर असून त्यात कुठल्याही व्यक्तीचा हस्तक्षेप होऊ न देता कारवाई केली गेली पाहिजे. तसेच जो कुणी दोषी असेल त्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. या मताचा मी देखील असून मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी देखील याबाबत स्पष्ट सांगितले असल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातानंतर पालकमंत्री अजित पवार कुठे आहेत ? असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जात होता. त्यावर आज अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत आपली बाजू मांडली आहे. यातच या घटनेबाबत बोलत असताना आरोपीला आधी बेल द्यायला नव्हती पाहिजे, परंतु ती देण्यात आली. त्यानंतर त्याचा जामीन नामंजूर करण्यात आला. त्याच्या वडिलाला अटक करण्यात आली. यातच या प्रकरणाची तीव्रता कमी झाली की त्याला वेगवेगळे फाटे फुटतात. तसं होऊ न देता ताबोडतोब त्यावर कारवाई झाली पाहिजे. असेही अजित पवारांनी सांगितले.
हेही वाचा…“पोलिस कर्मचाऱ्याचा पबमधला फोटो ट्विट करत धंगेकरांचा पोलिसांवर निशाणा,” कारवाई करा अन्यथा…
सुनील टिंगरे यांनी देखील या संपुर्ण प्रकरणाबाबत खुलासा केला आहे. त्याच्यामध्ये काय आणि कसं घडलं आहे ? ते सांगितलं आहे. त्यासंदर्भामध्ये एकदा चौकशीच्या सुचना दिल्या असून सत्य काय ते लवकरच बाहेर येईल. असेही अजित पवारांनी सांगितलंय. यातच यामध्ये जो कुणी दोषी असेल, ते कितीही मोठे असले, कितीही श्रीमंतांच्या बापाचा पोरगा असेल तरी त्याच्यावर पद्धतीशीरपणे कायद्यान्वेय कारवाई होईल. असेही अजित पवारांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, घटना घडल्यानंतर प्रत्येक गोष्टीची माहिती सीपीकडून घेत होतो. घटना घडल्यापासून नेमकं काय काय घडलं ? कुणाला अटक केली ? काय घडतंय ? हे सर्व पालकमंत्री या नात्याने त्याकडे माझं बारकाईने लक्ष होतं. यातच या प्रकरणामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाचाही हस्तक्षेप होणार नाही. जे काही असेल तर कायद्याने कारवाई केली जाईल. असा शब्द मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिला असल्याचेही अजित पवारांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…“गृहमंत्री महोदय, आता तरी जागे व्हा”, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना जोरदार टोला
हेही वाचा..विशाल अग्रवालला कोर्टाचा मोठा दणका, कोर्टात आज नेमकं काय काय घडलं ?
हेही वाचा..राज्यात पाण्याची भीषण टंचाई, शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ‘या’ मागण्या
हेही वाचा…लोकसभेनंतर विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी निवडणुकांची घोषणा, नवीन वेळापत्रक जाहीर
हेही वाचा…“गृहमंत्री महोदय, गाडीखाली कुत्रं नाही तर जीवंत माणसं चिरडली जातायेत”