पुणे : इंदापुरचे तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी भ्याड हल्ला केल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे हा हल्ला तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर झाला आहे. त्यामुळे या प्रकरणानंतर हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. यातच शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच संताप देखील व्यक्त केला आहे.
हेही वाचा…“पोलिस कर्मचाऱ्याचा पबमधला फोटो ट्विट करत धंगेकरांचा पोलिसांवर निशाणा,” कारवाई करा अन्यथा…
या हल्ल्याबाबत सुप्रिया सुळे यांनी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की, हल्लेखोरांनी ड्रायव्हरच्या डोळ्यांत मीरचीपुड देखील फेकली असे समजत आहे. ही अतिशय गंभीर आणि संतापजनक घटना आहे. गुन्हेगारांना कसलाही धाक उरलेला नाहीय. शासकीय अधिकाऱ्यांना मारहाण करण्यापर्यंत त्यांची मजल जाते ही बाब राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची स्थिती कशी ढासळली आहे हे सांगण्यास पुरेशी असल्याचेही त्यांनी सांगितलं.
हेही वाचा…गावाच्या पारावर राजकारणासाठी गेला जीव, कोण जिंकणार ? वाद झाला अन्…
यातच तहसीलदार पाटील यांच्याशी मी स्वत : संपर्क साधून त्यांची विचारपूस केली. ही संपुर्ण घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याची गरज आहे. गृहमंत्री महोदय, आता तरी जागे व्हा. आपल्या राज्यात गाडीखाली माणसं चेंगरणारे आपल्या खात्याच्या कृपेमुळे जामीनावर सुटतात. या घटनेचा निषेध. असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय.
तर देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही म्हणाला होतात की, ‘‘गाडीखाली कुत्रं आलं तरी विरोधक राजीनामा मागतील.’’ गृहमंत्री महोदय…. गाडीखाली कुत्रं नाही तर जीवंत माणसं चिरडली जातायेत… रस्त्याने चालणारा सामान्य माणूस सुरक्षित नाही.. भर दिवसा इंदापूर तहसीलदारावर हल्ला झाल्याने अधिकारीही सुरक्षित नाही.. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक नाही आणि पुण्याच्या पालकमंत्र्यांचा पत्ता नाही! कुठंय तुमचं कायद्याचं राज्य? आपण नेहमी नैतिकतेचे कांदे सोलता… आता थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या. असा टोला रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे.
READ ALSO :
हेही वाचा..विशाल अग्रवालला कोर्टाचा मोठा दणका, कोर्टात आज नेमकं काय काय घडलं ?
हेही वाचा..राज्यात पाण्याची भीषण टंचाई, शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ‘या’ मागण्या
हेही वाचा…लोकसभेनंतर विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी निवडणुकांची घोषणा, नवीन वेळापत्रक जाहीर
हेही वाचा…“गृहमंत्री महोदय, गाडीखाली कुत्रं नाही तर जीवंत माणसं चिरडली जातायेत”