मुंबई :महाराष्ट्रात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे आता राजकारण पेटू लागले आहे. महाराष्ट्र सरकारने आता काही नवीन ऑक्सिजन निर्मितीच्या प्लांट ला मंजुरी दिलेली आहे. भारतीय जनता पक्षाने आता ऑक्सिजनच्या मुद्द्यांवरून आता राज्य सरकारला घेरले आहे. महाराष्ट्रात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे करण्यासाठी केंद्र सरकारकडून पीएम केअर फंडातून निधी देण्यात आला होता. मात्र आघाडी सरकारने या निधीचा विनियोगच केला नाही . राज्य सरकारने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी दिलेल्या निधीचे काय केले याचा आघाडी सरकारने हिशोब द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केली . मुंबई येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते.
कोरोना सारख्या जागतिक महामारीत कोणतेही राज्य अडचणीत येऊ नये अथवा कोणत्याही राज्याला आरोग्य विषयक अडचणी येऊ नयेत यासाठी केंद्र सरकारने प्रत्येक राज्यालाजानेवारी महिन्यात पत्रव्यवहार करून पहिलेच अवगत केलेले होते. ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याबाबत देखील सूचना केलेल्या होत्या. पीएम केअर फंडातून महाराष्ट्र राज्यासाठी १० ऑक्सिजन निर्मिती करणारे प्रकल्प उभे करण्यासाठी मोठा निधी देण्यात आला होता. मात्र राज्य सरकाने दुर्लक्ष करत गेल्या ६ महिन्यांमध्ये एकही प्रकल्प उभा केला नाही. जर इच्छाशक्ती असती तर केंद्राने दिलेले अर्थसहाय्य व मुख्यमंत्री निधीत पडून असलेला पैसा यातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे राहिले असते.
आज ऑक्सिजनच्या साठ्या अभावी अनेक निष्पाप लोकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. महाराष्ट्रात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे करण्यासाठी केंद्र सरकारकडून पीएम केअर फंडातून निधी देण्यात आला होता. मात्र आघाडी सरकारने या निधीचा विनियोगच केला नाही. केंद्राने दिलेला निधी आणि मुख्यमंत्री निधीतून ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे केले असते तर राज्यात ऑक्सिजन अभावी अनेकांचा बळी गेला नसता. केंद्र सरकारने ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी दिलेल्या निधीचे काय केले याचा आघाडी सरकारने हिशोब द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी केली.