मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना यांच्यात चांगलाच सामना रंगलेला पहायला मिळतोय. त्याच पार्श्वभूमीवर कंगनाला आता केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कंगनाला सुरक्षा देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
गेल्या काही दिवसांपासून कंगना राणावत आणि संजय राऊत यांच्यामध्ये ट्विटर वॉर सुरु असल्याचे पहायला मिळत आहे. त्याच अनुषंगाने कंगनाच्या वडिलांनी मागणी केल्यानंतर हिमाचल प्रदेश सरकार कंगनाला सुरक्षा देणार होते. याबाबतची माहिती स्वत: हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी दिली होती.
मात्र आता कंगनाला थेट केंद्र सरकारने सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजपकडून थेट शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिऊन येते. त्यामुळे आता शिवसेना याबाबत या भाष्य करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे.
तसेच याबाबत कंगना राणावतने गृहमंत्री अमित शहा यांचे ट्विटरवरून आभार मानले आहेत. तर गृहमंत्र्यांनी मला काही दिवसांनी मुबईला जाण्याऐवजी न सांगता सुरक्षा देत एका देशाच्या मुलीच्या वचनाचा मान ठेवल्याचे कंगनाने म्हंटले आहे.
ये प्रमाण है की अब किसी देशभक्त आवाज़ को कोई फ़ासीवादी नहीं कुचल सकेगा,मैं @AmitShah जी की आभारी हूँ वो चाहते तो हालातों के चलते मुझे कुछ दिन बाद मुंबई जाने की सलाह देते मगर उन्होंने भारत की एक बेटी के वचनों का मान रखा, हमारे स्वाभिमान और आत्मसम्मान की लाज रखी, जय हिंद 🙏 https://t.co/VSbZMG66LT
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 7, 2020
Read Also
मी दाऊदला दम दिला होता . . राऊत यांचा ‘तो’ व्हिडीओ टाकत आ.राम सातपुते यांनी विचारला सवालhttps://t.co/sLt8C2TTkQ@RamVSatpute @rautsanjay61
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 7, 2020