महाराष्ट्रात काही घडले की मुख्यमंत्री उध्दव ठाकरे असो किंवा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांना काही म्हणायचे नसते पण ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना म्हणायचे असते, नेतृत्त्वावर निष्ठा दाखवण्यासाठी केवढी केविलवाणी धडपड ते करत असतात, त्यांची ही सवय म्हणजे “आ बैल मुझे मार’ अशी आहे, अशी टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
लॉकडाऊनच्या काळात अधिकारांच्या बदल्या केल्याबाबत विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले आहे. यापार्श्वर्भूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत तम्ही काही केले नाही तर झोंबंतंकशाला असा सवाल पाटील यांनी सरकारला विचारला आहे.
2014 ते 2019 बदल्यांमध्ये घोटाळे झाले तर काय झोपा काढत होतात ? अशी विचारणा करून पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, इतक्या उशिरा जाग आल्यामुळे चौकशी करायची तर करा, पण आधी 2020 बदल्यांमधील करा. तुम्ही काही केले नाही तर झोंबंतं कशाला?असे पाटील म्हणाले आहेत.
ग्रामपंचायतींना प्रशासक, पी एम केअर, अभिनेता सुशांतसिंग प्रकरण सगळ्या विषयांमध्ये कोर्टाकडून थपडा खायचे असतील तर कोण काय करणार? मी जे म्हणतो ते महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांनीच म्हटले आहे. आस्थापना समितीच्या शिफारशींच्या बाहेर मी सह्या करणार नाही, अशी भूमिका पोलीस महासंचालकांनी घेतली आहे, त्यावर मुश्रीफ यांनी पहिल्यांदा बोलावे, असेही या पत्रकात म्हटले आहे.