भाजपच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नावावरुन शेरेबाजी करणाऱ्यांना इशारा दिला. नावावरुन यापुढे कोणी हिणवलं, की खपवून घ्यायचं नाही, असा आदेशच पाटलांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला
विधानसभा निवडणुकीत चंद्रकांत पाटील आणि फडणवीसांवर राष्ट्रवादी, मनसे आणि सोशल मीडियावरुन सुरु झालेली शेरेबाजी अजूनही सुरुच आहे. यामुळेच आता चंद्रकांतदादा चांगलेच संतापले आहेत. “यापुढे जर चंपा किंवा टरबुज्या कोणी म्हटलं, की थेट पलटवार करायचा”, अशी खुली सूटच पाटलांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिली.
राजकारणात नेत्याची इमेज फार महत्वाची असते. पण, त्याचवेळी एखादे टोपण नाव पडले की, मग आयुष्यभर त्या टोपण नावाची साथ काही सुटत नाही. त्यामुळे हीच टोपण नावं आता चंद्रकांत पाटलांच्या जिव्हारी लागली आहेत.