मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात झालेल्या भेटीनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मोठे विधान केले आहे.
यातच राज्यात सध्या मध्यावधी निवडणुकीसारखी परिस्थिती आहे, मध्यावधी निवडणुका कुठल्याही पक्षाला नको, एक निवडणूक लढणं, पक्षाला आणि उमेदवाराही अवघड असतं, अनिश्चितता राहते, शेवटी कोणाची तडजोड झाली नाही तर मध्यावधी निवडणुका होऊ शकतात. आगामी निवडणूक भाजपा स्वबळावर लढवेल असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
दरम्यान, भाजपातील अनेक नेते सत्ताधारी पक्षात येण्यासाठी उत्सुक आहेत. राष्ट्रवादीतून जे जे लोक गेले त्यातील बरेच लोक पुन्हा परतण्याच्या स्थितीत आहे असा पलटवार राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी भाजपावर केला आहे. मात्र यामुळे अनेक चर्चाना उधाण आले आहे. आघाडीत खर्च काही बिघाड होणार का याकडे लक्ष लागून आहे.
Read Also :
शरद पवार यांनी एनडीए मध्ये यावे,CM ठाकरेंनी पुन्हा भाजप सोबत युती करावी 'या' केंद्रीय मंत्र्याने दिली खुली ऑफर https://t.co/7f80OYHscp#Sharadpawar #Devendrafadanvis #Uddhavthackarey #BJP #NDA
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 28, 2020