मुंबई : संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात दोन तास चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या भेटीला अशा भेटी होतच राहतात, असं वक्तव्य चंद्रकांत पाटीलबोलताना केलं.
‘देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात अशी काही भेट झाल्याची माहिती नाही. किंबहुना आज संध्याकाळी कार्यकर्त्यांचा खूप मोठा वेबिनार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात दीड लाखांपेक्षाही जास्त लोक सहभागी झाले. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसही होते’, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
गेल्या नऊ महिन्यांमध्ये सरकार जाणार अशी चर्चा सुरु आहे. पण देवेंद्र फडणवीस, मी किंवा आमचे कुठलेच नेते हे सरकार पडेल, असं म्हणाले नाहीत. हे सरकार जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करत नाही. पण हे सरकार अंतर्गत विरोधांमुळे पडेल, असं सर्वसामान्य जनता म्हणत आहे. हे सरकार पडेल तेव्हा पडेल. पण आम्ही त्यात कोणतीही भूमिका बजावणार नाही’, असं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.
Read Also :
भाजपचे आणखी नगरसेवक आमच्या संपर्कात,संग्राम जगताप यांचा गौप्यस्फोटhttps://t.co/n8oXq6aYSe#SangramJagtap #NCP #BJP @sangrambhaiya
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 26, 2020