औरंगाबाद : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल औरंगाबाद येथे 1680 कोटींची शहर पाणी पुरवठा योजना, स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यान, सफारी पार्क (Safari parks), शहरातील 152 कोटींच्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या स्टेजवर पोहचल्यावर मुख्यमंत्री ठाकरेंच्या एका निर्णयाने त्यांनी तेथील सर्वांचीच मने जिंकली.
औरंगाबाद येथे योजनांचे भूमिपूजन करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्री ठाकरेंचा साधेपणा पुन्हा एकदा सर्वाना पाहण्यास मिळाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्यासपीठावर पोहोचले, तेव्हा त्यांच्यासाठी राजेशाही खुर्ची ठेवण्यात आली होती.
संभाजीनगर (औरंगाबाद) येथे पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन तसेच विविध विकास कामांचा शुभारंभ- LIVE https://t.co/gCXSSbDCQy
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 12, 2020
मात्र, इतर नेत्यांसाठी साधी खुर्ची व त्यांच्यासाठी राजेशाही खुर्ची असल्याचे लक्षात येताच, मुख्यमंत्र्यांनी त्वरित ती खुर्ची बदलण्यास सांगितली. सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने व्यासपीठावरून राजेशाही खुर्ची हटवली आणि त्या जागी साधी खुर्ची ठेवली.
राजेशाही खुर्ची हटवून, साधी खुर्ची ठेवल्यावरच मुख्यमंत्री बसले. त्यांचा हा साधेपणापाहून तेथील सर्वचजण भारावून गेले.
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज औरंगाबादमधील पाणी पुरवठा योजनेसह चार महत्त्वाच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, कोरोना काळात बसून केलेल्या कामाच्या शुभारंभाची सुरुवात झाली आहे.अनेक वर्षांपासून पाणी पुरवठा योजना रखडली होती. नुसता लेझीम खेळ सुरू होता. माझ्या कवाडीमुळे लोकांच्या घरात पाणी जात असेल तर माझं भाग्य आहे. काम न करता मला लाडका मुख्यमंत्री व्हायच नाही. काम करून मला लाडकं व्हायचे आहे.