मुंबई : महाराष्ट्रातले सगळे मदरसे बंद करून हिंदुत्ववादी सरकारने आपले खरे हिंदुत्व दाखवून द्यावे अशी मागणी भाजपचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील मदरसे वाढविण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो, त्यातून कोणतेही आधुनिक शिक्षण न देता केवळ एका विशिष्ट धर्माचे शिक्षण दिले जाते नसल्याचे भातखळकर म्हणाले.
राज्यातील करदात्यांच्या पैशावर चालणारे हे प्रकार अत्यंत चूक असून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील मदरसे व तेथील मौलवींना दिली जाणारी आर्थिक मदत तत्काळ थांबवून अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात थेट मदत द्यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली.
आसाममध्ये मदरसे बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता महाराष्ट्रात देखील भाजपकडून ही मागणी केली जात आहे.