नवी दिल्ली : देशात महामारीच्या दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे बेड्स, ऑक्सिजन, व्हेन्टिलेटर्स, रेमेडीसीवर इंजेक्शन्स आणि लसींची कमतरता जाणवत आहे. परिणामी रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होत आहेत, तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक, मग ते केंद्रातले असो की राज्यातले एकमेकांवर सडकून टीका, आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत.
दरम्यान, देशात १ मेपासून लसीकरण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत १८ वर्षांच्या पुढील सर्वांचं लसीकरण केलं जाणार आहे. मात्र आता करोना लसींच्या किंमतींवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात वाद सुरु झाला आहे. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर, ट्विट करून निशाणा साधला आहे.
चर्चा बहुत हो चुकी।
देशवासियों को वैक्सीन मुफ़्त मिलनी चाहिए- बात ख़त्म।
मत बनाओ भारत को भाजपा system का victim!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 26, 2021
“चर्चा खूप झाली. आता देशातील प्रत्येक नागरिकाला मोफत लस मिळाली पाहीजे. विषय संपला..भारताला भाजपच्या प्रणालीचा बळीचा बकरा बनवू नका”, असा हल्लाबोल त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून केला आहे. राहुल गांधी सातत्याने केंद्रातील मोदी सरकारवर टीकेची झोड उठवताना दिसत आहेत.