कांदा निर्यात बंदीतून मोदी सरकारचे शेतकऱ्यांबद्दलचे पुतना मावशीचे प्रेम आणि धोरण लकवा दिसून येतो. ३च महिन्यांपूर्वी ढोल बडवून कांदा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून काढण्यासाठी जीवनावश्यक वस्तू कायद्यात बदल केला होता. @PrakashJavdekar यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याबद्दल माफी मागावी
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 15, 2020
महाराष्ट्रातून कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाला मोठ्याप्रमाणात विरोध होण्याची शक्यता आहे. आजच नाशिकच्या लासलगाव बाजारपेठेत व्यापाऱ्यांकडून निदर्शने करण्यात आली. कांदा निर्यातबंदी हा शेतकऱ्यांशी केलेला विश्वासघात असल्याची प्रतिक्रिया किसान सभेचे सरचिटणीस अजित नवले यांनी व्यक्त केली. त्यामुळे आता राज्यातील शेतकरी संघटना आक्रमक होण्याची चिन्हे आहेत.