काँग्रेसमधील पाच माजी मुख्यमंत्र्यांसह २३ वरिष्ठ नेत्यांनी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाच्या वाढीसाठी नेतृत्वासह सर्वच पातळ्यांवर मोठे बदल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज्यातील अनेक नेत्यांनी राहुल गांधींनीच नेतृत्व करावे अशी मागणी केल्याचे दिसून आले.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याकडे पुन्हा काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात यावे अशी मागणी काँग्रेसच्या काही नेत्यांकडून करण्यात येत आहे. तर काहींनी आडमार्गाने विरोध दर्शवला आहे. मात्र महाराष्ट्राचे पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी राहुल गांधींनी पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारावं, असं मत व्यक्त केलं आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वड्डेटीवार बोलत होते. तसेच यावेळी वड्डेटीवार यांनी महाविकास आघाडीच्या सरकारबाबत देखील महत्वाचे विधान केले.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, सोनिया गांधींनी पक्षाला उभारी दिली. कॉंग्रेस पक्षात खऱ्या अर्थानं लोकशाही असून गांधी कुटुंबानंच पक्षाचं नेतृत्व करावं. तसेच गांधी परिवाराकडे पक्ष आणि देश सांभाळण्याची क्षमता असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. त्याचप्रमाणे राहुल गांधींच्या इच्छेनुसारच कॉंग्रेस महाविकास आघाडीत सहभागी आहोत राहुल गांधींनी निर्णय घेतला की सरकारमधून बाहेर पडावं तर बाहेर पडू, असं मोठं विधानही विजय वडेट्टीवर यांनी केलं आहे. विजय वडेट्टीवार यांच्या या विधानामुळे आता वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
Read This Also –
BIG BREAKING
काँग्रेसची बैठक वादळी ! नेत्यांनी भाजपशी संगनमत केल्याचा राहुल गांधींचा आरोपhttps://t.co/LKQ6i9cf34#Congress #PoliticalMaharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) August 24, 2020