महाराष्ट्रातील जनता वाढत्या वीजबिलांनी त्रस्त असताना उर्जामंत्री उत्तर प्रदेशच्या राजकीय दौऱ्यावर गेले आहेत. उत्तर प्रदेशची जबाबदारी प्रियंका गांधी यांच्यावर सोपविण्यात आल्याने आपली कार्यतत्परता दाखवण्यासाठी त्यांच्यासमोर जाणे ही उर्जामंत्र्यांची राजकीय गरज असल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच केली होती. त्याला उत्तर देताना ऊर्जामंत्री राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना सणसणीत टोला लगावला आहे.
चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या मनातील दलितांसाठीचे प्रेम अधिक प्रदर्शित करू नये, त्याने कोथरुडकर मतदारांचं सोवळं मोडेल आणि पुढच्यावेळी पुन्हा सुरक्षित मतदारसंघ शोधण्याची धावपळ करावी लागेल, असा टोला राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी लगावला आहे.राऊत यांनी ट्विटरवर लिहिलेल्या पत्रात अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे.
काय म्हणालेत नितीन राऊत नेमकं यावेळी
विजेची बिले वाढीव, अवास्तव नसून ती रास्त आहेत हे मी आणि अधिकाऱ्यांनी वेळोवेळी समजावून सांगितले आहे.
पाटील यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने भाष्य करताना थोडा अभ्यास करावा अशी अपेक्षा आहे.
देशाची अर्थव्यवस्था आज व्हेंटीलेटरवर आहे.
रिझर्व्ह बँकेकडून आगाऊ पैसे घेऊन पंतप्रधान देशाचा गाडा हाकत आहेत.
प्रत्येक राज्याच्या खजिन्यात खडखडाट आहे,
मलाही माझ्या खात्यात काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांचे पगार द्यायचे आहेत.