पुणे : ‘जम्बो कोविड सेंटर आणि ऑक्सिजनच्या तुटवड्या विषयी सतत तक्रारी येत आहेत. आता खूप झाले, यापुढे तक्रारी आल्यास हयगय केली जाणार नाही’, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. विभागीय आयुक्त, पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांचे आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी एकत्रपणे नियोजन करून परिस्थिती नियंत्रणात आणावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
अजित पवार यांच्या उपस्थितीत करोनाच्या सद्यस्थितीचा आढावा विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आला. जम्बो सेंटर विषयी सतत तक्रारी येत आहेत; तसेच ऑक्सिजनच्या पुरवठ्याअभावी रुग्णांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री पवार यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
जमाबंदी आयुक्त एस चोक्कलिंगम यांनी अन्य राज्यांमध्ये ‘जनता कर्फ्यू’ मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असल्याचे बैठकीत निदर्शनास आणून दिले. त्यावर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘आवश्यकता भासल्यास ‘जनता कर्फ्यू’ करा. मात्र हे करताना नागरिकांना त्रास आणि व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी’
Read Also
कंगनाच्या कार्यालयावरील कारवाईशी सरकारचा संबंध नाही : शरद पवार