मुंबई: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा आज ८४ वा वाढदिवस आहे. अण्णांवर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अण्णांना एकीकडे वाढदिवसाच्या शुभेच्छा देत दुसरीकडे मात्र सडकून टीका केली आहे.
देशात प्रचंड महागाई वाढले आहे. पेट्रोल-गॅस-डिझेल-खाद्यतेल यांचे भाव गगनाला भिडलेले आहे, तसेच ढासळती अर्थव्यवस्था,कोरोना मुळे कोलमडलेली, आरोग्यव्यवस्था तसेच वाढती सामाजिक दरी निर्माण झाली आहे. भारत सिमेवर तणावाचे वातावरण आहे. यासर्व गोष्टीसाठी नव्हे तर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी हा मेसेज होता. अशा शब्दात जिंतेंद्र आव्हाड यांनी आण्णा हजारें यांच्या टीका केली आहे. आहे.
प्रिय अण्णा….
प्रचंड महागाई ,पेट्रोल-गॅस-डिझेल-खाद्यतेल यांचे गगनाला भिडलेले भाव,ढासळती अर्थव्यवस्था,कोरोना मुळे कोलमडलेली आरोग्यव्यवस्था,वाढती सामाजिक दरी,चीन सोबत सीमेवरील तणाव ह्यांच्या बद्दल नाही तर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी हा मेसेज होता#HappyBirthdayAnna pic.twitter.com/vYuBjKQJfL— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 15, 2021
भाजपची सत्ता आली आणि आण्णा हजारें यांचा आराम सुरु झाला असल्याचे बोले जात आहे. एरवी छोट्या मोठ्या प्रश्नावर रस्त्यावर उतरुन आंदोलन करणारे अण्णा हजारे भाजपाची केंद्रात सत्ता आल्यानंतर अदुश्य झाले आहे. काँग्रेस काळात आंदोलने करणारे अण्णा हजारे अचानक पणे गायब झाल्याने त्यांच्यावर अनेंकदा टीका होताना दिसत आहे.
हे पण वाचा: राष्ट्रवादीसमोर पेच; स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी उमेदवार कुठून आणणार?
देशात करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने जनजीवन पूर्वपदावर येत असताना महागाईच्या भडक्याचे मोठे आव्हान अर्थव्यवस्थेपुढे उभे राहिले आहे. मे महिन्यातील घाऊक तसेच किरकोळ असे दोन्ही प्रमुख निर्देशांक विक्रमी टप्प्यावर पोहोचले. पेट्रोलचे दर देखील गगनाला भिडले आहेत.त्यामुळे विरोधी नेते केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपावर टीका करत आहेत.
हे पण वाचा: सर्वच लोकप्रतिनिधींना गाडा, म्हणजे बोलणाऱ्यांनाही गाडा…असं आहे ना.! – अजित पवार