पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे राज्यातील साखर उत्पादन आणि साखर कारखानदारीसंदर्भात बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार यांनी यावेळी विविध मुद्यांवर भाष्य केले. भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणावरुन घेतलेल्या भूमिकेबाबत पत्रकारांनी विचारले असता अजित पवार यांनी उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकार समाजात दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करतंय हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचं म्हटलं. यासोबतच उदयनराजे भोसले यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने लोकप्रतिनिधींना गाडा असं वक्तव्य केलं आहे, असं पत्रकारांनी विचारलं असता सर्वच लोकप्रतिनिधींना गाडा असं म्हटलं आहे ना, असा सवाल अजित पवार यांनी केला. तर दुसरीकडे असं बोलणारेही लोकप्रतिनिधीचं आहेत ना, असं देखील अजित पवार म्हणाले.
हे पण वाचा, “दिशाभूल करणं छत्रपती घराण्याच्या रक्तात नाही”, मराठा आरक्षणावर उदयनराजेंनी मांडली रोखठोक भूमिका
उदयनराजे भोसले यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने लोकप्रतिनिधींना गाडा असं वक्तव्य केलंय, असं पत्रकारांनी अजित पवार यांना विचारले. त्यावर “सर्वच लोकप्रतिनिधींना गाडा असं आहे ना…. बोलणारेही लोकप्रतिनिधीच आहेत”, असा सवाल अजित पवार यांनी केला. पवारांच्या या उत्तरावर खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहावं लागणार आहे.
हे पण वाचा, “लोकप्रतिनिधींना मतदारसंघात फिरकून देऊ नका”, मराठा आरक्षण निकालावर उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केलं आहे. त्यासाठी आम्ही केंद्र सरकारला कायदा करण्याची मागणी केलीय. उद्या कोल्हापूरमधे होणाऱ्या आंदोलनात पालकमंत्री सतेज पाटील, हसन मुश्रीफ आणि इतर नेते भुमिका मांडतील. जुलै महिन्यात विधिमंडळाचे अधिवेशन आहे. त्यामधे मराठा आरक्षणाबाबत चर्चा होईल. हे सरकार आल्याने विरोधी पक्षातील अनेकांच्या पोटात दुखणे थांबलेले नाही. आज पडेल, उद्या पडेल असं म्हणत ते वेळ काढतायत. दुटप्पी भूमिका घेत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार शरद पवार, सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन बनवलय. हे तिघे नेते जोपर्यंत या सरकारच्या पाठिशी आहेत. तोपर्यंत हे सरकार भरभक्कम आहे. शिवसेना असेल किंवा कॉंग्रेस प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. आत्ताचा फॉर्म्युला हा उद्वव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा आहे. नानांना त्यांची इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे. पण मुख्यमंत्री बनण्यासाठी १४५ ची मॅजीक फिगर लागते. ती ज्याच्याकडे असते तो मुख्यमंत्री होतो, असे पवार यांनी बोलताना सांगितले.
Read Also :
- सेनेकडून सत्तेसाठी हिंदुत्वास काळीमा फासण्याचे काम; प्रविण दरेकरांची टीका
- केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलांच्या चर्चा, प्रीतम मुंडेंची मंत्रीपदी वर्णी लागणार ?
- ‘…तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल’
- ‘काँग्रेस नेत्यांकडे काका-पुतण्यांसमोर मान हलवण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही’
- ‘त्या’ १२ जणांच्या यादीच्या उपलब्धतेबाबत आज राजभवनात सुनावणी होणार