मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात भाजप नेते नारायण राणेंवर टीका केल्यानंतर आणि त्याला राणेंनी उत्तर दिल्यानंतर आता सिंधुदुर्ग आणि कोंकणात राजकारण तापलेलं आहे. कोंकणातील शिवसेना आणि भाजप नेत्यांनी एकमेकांवर जोडदार टीका करत आहे. आता यात माजी मंत्री दीपक केसरकर आणि राजन तेली यांनी उडी घेतली आहे.
दीपक केसरकरांनी भाजप नेते नारायण राणे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर माजी आमदार राजन तेली यांनी केसरकरांना प्रत्युत्तर देत त्यांच्यावर टीका केली आहे. ‘नारायण राणेंमध्ये कुवत होती म्हणून त्यांना शिवसेनेत पदे मिळाली. केसरकरांमध्ये कुवत नसल्यामुळे शिवसेनेने राज्यमंत्रीपदही काढून घेतलं. केसरकर शिवसेनेत आलेले आयत्या बिळावर नागोबा आहेत’ अशा शब्दात भाजपचे सरचिटणीस आणि माजी आमदार राजन तेली यांची दीपक केसरकरांवर टीका केली आहे.
दीपक केसरकर नाराज असल्याच्या चर्चांनंतर केसरकरांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी नारायण राणेंवर जोरदार टीका केली. “मी शिवसेनेमध्ये का गेलो, तर ज्यावेळी मी नारायण राणेंविरुद्ध लढलो आणि माझी ताकद दाखवली, तेव्हा सगळ्या मोठमोठ्या पक्षांच्या मला ऑफर होत्या. त्यावेळी उद्धव ठाकरे मला म्हणाले होते, कुठल्याही पक्षात जा, तुला निवडून आणण्याची जबाबदारी माझी. असं कोणीच करत नाही. ज्यांनी पदं दिलं, त्यांच्याशी तरी प्रामाणिक राहायला हवं” अशा भावना दीपक केसरकर यांनी व्यक्त केल्या.
Read Also ;
हे तर धोक्याचे सरकार, एक ‘घोटाळेबाज’ तर दुसरा ‘धोकेबाज’, काँग्रेसचा भाजपवर निशाणा https://t.co/N61sWMxE2i @INCMaharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) November 1, 2020