मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्यांवरून आणि मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आतापर्यंत 100 पत्रे लिहिली आहेत. मात्र त्यापैकी एकाही पत्राला मुख्यमंत्र्यांकडून अद्याप उत्तर देण्यात आलेले नाही.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर 2019 ते मार्च 2020 याकाळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अनेक लिहिली आहेत. कोरोनाच्या चाचण्या वाढवण्यापासून ते मंदिरे खुली करण्यासंदर्भात अशी विविध पत्रे भाजपने आतापर्यंत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन दरम्यान मुख्यमंत्र्यांना अनेक पत्र लिहिली. परंतू त्यापैकी एकाही पत्राचं उत्तर मला मिळालेलं नाही. यावरून आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
विरोधी पक्ष नेत्याच्या पत्रांना उत्तर द्यायला हिंमत आणि नियतही लागते, असे म्हणत भातखळकरांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.
दरम्यान, कोरोना संकट व लॉकडाऊनच्या काळात देवेंद्र फडणवीस सातत्याने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित आहेत. परंतु, त्यांच्या एकाही पत्राला उत्तर देण्यात आलेले नाही.