दिल्ली : केंद्र सरकारने संसदेत ‘शेती विधेयकं’ पास केल्यानंतर देशातील शेतकरी वर्ग अस्वस्थ झाला असून आता अनेक ठिकाणी शेतकरी आणि शेतकरी संघटना आंदोलन करत आहे. पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांनी या बिलांचा विरोध करताना ट्रॅक्टर रस्त्यावर उतरवून आंदोलन सुरु केलं आहे. आता संसदेत ही बिलं पास झाली आहेत आणि आता राष्ट्रपती रामनाम कोविंद यांच्या स्वाक्षरीनंतर त्याचे कायद्यात रुपांतर झाले आहे.
मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 24 वा दिवस आहे. कडाक्याच्या थंडीतही या शेतकऱ्यांचा उत्साह कायम आहे. सिंधु बॉर्डरवर थंडीची लाट आलेली असताना देखील शेतकरी ठाम निर्धाराने आंदोलनाच्या निर्मयावर टिकून आहेत. आता तर या आंदोलक शेतकऱ्यांनी आंदोलनाविषयीची प्रत्येक बित्तंबात इतर आंदोलकांपर्यंत पोहचवण्यासाठी आपलं स्वतंत्र वर्तमानपत्र सुरु केलंय. ‘ट्रॉली टाईम्स’ असं या पुस्तकाचं नाव आहे. हे वर्तमानपत्र 4 पानाचं असून यात शेतकऱ्यांची दिनचर्या, शेतकरी नेत्यांच्या मुलाखती आणि आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांचे किस्से छापले जात आहेत.
आंदोलक शेतकऱ्यांचं हे वर्तमानपत्र हिंदी आणि पंजाबी भाषेत प्रकाशित होत आहे. यात देशभरातील शेतकरी आंदोलनाविषयीच्या बातम्या छापल्या जातात. या आंदोलनाच्या सुरुवातीपासून शेतकरी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत आहेत. मात्र, आता या आंदोलक शेतकऱ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच निशाणा साधण्यास सुरुवात केलीय. आंदोलनाच्या ठिकाणी मोदी, अंबानी आणि अदानी यांची मिलीभगत असल्याच्याही घोषणा दिल्या जात आहेत.
आंदोलकांच्या वर्तमानपत्रावर भगतसिंगांच्या ओळी
शुक्रवारी दिल्लीच्या सिंधु आणि टिकरी बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हातात या वर्तमानपत्राची पहिली प्रत पडली. हे वर्तमानपत्र खास शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी काढले आहे. ट्रॉली टाईम्समध्ये, ‘इनकिलाब दि तलवार विचारां दि सान ते तेज होंदी ए (क्रांतीची तलवार विचारांच्या रसायनाने चमकते’) या ओळी होत्या. शहीद भगत सिंग यांचा संदर्भ देऊन हे वाक्य वापरण्यात आलंय.
वर्तमानपत्राचा उद्देश काय?
या वर्तमानपत्राचा उद्देश दिल्लीतील सीमेवर अनेक किलोमीटरपर्यंत पसरलेल्या आंदोलनातील सर्व शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहचणे हा आहे. शेतकरी आंदोलनाच्या मंचावर होणाऱ्या भाषणांची आणि निर्णयांची माहिती. सरकारसोबतच्या चर्चेचे तपशील मंचापासून दूरवर असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी हे वर्तमानपत्र काढलं जात आहे.
12,000 रुपयांमध्ये 2,000 प्रती
दिल्लीच्या सीमेवर 26 नोव्हेंबरला सुरु झालेलं हे शेतकरी आंदोलन आणखी आक्रमक होणार आहे. या आंदोलनात मोदी सरकारचे नवे 3 कृषी कायदे रद्द करण्याची मागणी होत आहे. दिल्लीच्या सिंधु आणि टिकरी सीमेवर सध्या जवळपास 3 लाख शेतकरी जमा झाले आहेत. अनेक लोक मंचापर्यंत पोहचू शकत नाही. त्यांच्यापर्यंत आंदोलनाची पूर्ण माहिती पोहचावी म्हणून ‘ट्रॉली टाइम्स’ महत्त्वाचा ठरणार आहे. केवळ 12,000 रुपयांमध्ये याच्या 2,000 प्रती छापण्यात आल्या. यापैकी 1,200 सिंधु बॉर्डरवर आणि 800 टिकरी बॉर्डरवर वाटण्यात आल्या.
केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बदल यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देऊन बाहेर पडल्यानंतर आता त्यांनी सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे.
पंजाबमध्ये मोठा शेतकरी वर्ग अकाली दलाचा पारंपरिक मतदार आहे. शेती विधेयकावरून आधीच पंजाबमध्ये चर्चा सुरु होती. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी हा कायदा यायच्या आधीच विरोध केल्याने अकाली दलाची अडचण झाली होती.
शेती विधेयकाला विरोध करुन राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीए मधून बाहेर पडलेल्या शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिमरतकौर बादल यांनी आता केंद्रातील भाजप सरकारला शह देण्यास सुरुवात केली आहे.
केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर हरसिमरत कौर बादल आणि त्यांचा पक्ष शिरोमणी अकाली दल आक्रमक झाले आहेत. केंद्रातील मोदी सरकारने आणलेल्या कृषी विधेयकांच्या मुद्यावरून शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. यावरून अकाली दल आता शेतकऱ्यांसाठी मोठी लढाई लढण्याच्या मनस्थितीत आहे.
हरसिमरत कौर बादल यांचा कॅबिनेट मंत्रिपदाचा राजीनामा
शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांनी कृषी विधेयकांना विरोध कर केंद्र सरकारच्या कॅबिनेट मंत्री पदाचा नुकताच राजीनामा दिला होता. अकाली दलाने केंद्राच्या कृषी विधेयकांविरोधात मतदान करत संसदेपासून ते रस्त्यापर्यंत या विरोधात उतरण्याचा इशारा दिला होता. केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल मोदी सरकारमधील अकाली दलाच्या एकमेव प्रतिनिधी होत्या.
केंद्राने दुर्लक्ष केल्याचा आरोप
आम्ही कृषी विधेयकांचा निषेध करूनही केंद्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि आमचं ऐकलं नाही, असा आरोप हरसिमरत कौर बादल यांनी केला. यापूर्वी लोकसभेत अकाली दलाचे प्रमुख सुखबीर बादल यांनी या विधेयकाविरोधात इशारा दिला होता. सरकारने कृषी विधेयकं मागे घेतली नाही तर हरसिमरत कौर बादल या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देतील, असा इशारा त्यांनी दिला होता.
Read Also :
…पण कोट्यवधी देशवासीयांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं; राहुल गांधींचा मोदींवर ट्विट हल्ला
आमदार फोडण्याची ताकद अजित पवार यांच्यात नाही, चंद्रकांत पाटलांची टीका
“शरद पवारांचा पंटर, खबऱ्या, चमचा…,” संजय राऊतांना खरमरीत पत्र
‘लग्नात वाढप्याची जी भूमिका असते तिच महाभकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची’
ममता दीदी, ही तर सुरूवात, निवडणुकीपर्यंत एकट्याच राहाल; अमित शाह यांचा घणाघात