मुंबई : राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेस पुन्हा एकदा दुखावला असल्याचं मध्यंतरी समोर आलं होतं. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका झाल्यानं महाआघाडीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या कार्यशैलीबद्दल भूमिका मांडली होती. त्यावरूनच काँग्रेस नाराज असल्याचं बोललं जात होतं. दरम्यान, राज्यातील एकंदरीत परिस्थितीवरून भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर टीका केली.
“लग्नात वाढप्याची जी भूमिका असते तिच भूमिका महाभकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची आहे,” असं म्हणत भातखळकर यांनी काँग्रेसला जोरदार टोला लगावला. त्यांनी ट्विटरवरून काँग्रेसला टोला लगावला. यापूर्वी काँग्रेसच्या नेत्या आणि महिला व बालविकासमंत्री यषोमती ठाकूर यांनी काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टिप्पणी करणे टाळावे, असा इशारा देत आघाडी धर्माचे पालन सर्वानी करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती.
राहुल गांधी यांच्याबाबत विधाने सहन केली जाणार नाहीत, असाच सूचक इशारा यातून ठाकूर यांनी दिला होता. काँग्रेसचे नेतृत्व अतिशय स्थिर आहे, निर्णयक्षम आहे. राज्यातील महाविकास आघाडी हा त्याच निर्णयक्षमतेचा परिपाक आहे, असेही त्यांनी म्हटलं होतं.
लग्नात वाढप्याची जी भूमिका असते तीच भूमिका महाभकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची आहे…🤓
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 18, 2020
राजकीय नियुक्त्या कराव्या
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. आता शासकीय महामंडळे, मंडळे, समित्यांवरील राजकीय नियुक्त्या लवकर झाल्या पाहिजेत, असा आग्रह काँग्रेसने धरला होता. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला घाई नसेल तर काँग्रेसचा कोटा निश्चित करून द्यावा, त्यानुसार आमच्या नियुक्त्या केल्या जातील, असे मत महाराष्ट्राचे प्रभारी एच.के . पाटील यांनी यापूर्वी व्यक्त केलं होतं.
राज्यपाल नामनिर्देशित विधान परिषदेवरील नियुक्त्यांसाठी लोकसभा निवडणुकीत एका काँग्रेस नेत्याच्या विरोधात निवडणूक लढविलेल्या उमेदवाराची राष्ट्रवादी काँग्रेसने शिफारस के ल्याबद्दल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली होती. राज्य सरकारमधील तीनही पक्षांनी आघाडीचा धर्म पाळला पाहिजे, असंही ते यापूर्वी एका पत्रकार परिषदेत म्हणाले होते.
Read Also :
‘सरनाईकांचा प्रताप’, तानाजी मालुसरेंवर बोलताना सोडली पातळी
‘हे तर स्मशानांचे रखवालदार’, टिळकांच्या विधानांची आठवण देत आशिष शेलारांनी सरकारला सुनावलं
भाजपमध्ये दहापेक्षा जास्त आमदार नाराज, राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती-जयंत पाटील