मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक नेहमीच चर्चेत असतात. अगदी रिपब्लिकचे अर्नब गोस्वामी किंवा कंगना रनौत या दोघांनीही सरनाईकांनी नेहमीच शिंगावर घेतलं आहे. त्यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत या दोघांविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर केला होता. पण आता शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांनी एक मोठा ‘प्रताप’ केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी धारातीर्थी पडलेले शूरवीर तानाजी मालुसरे यांच्याबद्दल अतिशय घाणेरडे आणि वादग्रस्त वक्तव्य केले आहे. आता या सर्व प्रकरणांवरुन सरनाईकांवर शिवप्रेमी तुटून पडले आहे.
प्रताप सरनाईक यांच्या भोवती आदींचा ससेमिरा चालू आहेत त्यातच त्यांच्यावर अनेक आरोप लगावले जात आहे. काळ सरनाईक यांनी प्रतिकारणसमोर काही खुलासे केले त्यातच अभिनेत्री कंगना रानौत हिने देखी सरनाईक यांच्यावर काही आरोप केले होते. प्रताप सरनाईक यांच्या घऱी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याचा आरोप कंगनाने केला आहे. याविरोधात प्रताप सरनाईक यांनी आक्रमक भूमिका घेतली असून हक्कभंग प्रस्ताव सादर केला आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली
तसेच यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी नरवीर तानाजी मालुसरे त्यांचे नाव घेत एक विधान केले होते त्यावर आता भाजपने आक्षेप घेत सरनाईक यांचा जाहीर निषेध केला आहे. ” नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बद्दल आपली पातळी सोडून बोलणाऱ्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी त्वरित आमदारकीचा राजीनामा द्यावा.” अशी मागणी भाजपकडून होत आहे. याबाबत त्यांनी ट्विटरवर त्यांचा विधानाचा व्हिडीओ टाकत त्यावर निषेध व्यक्त केला आहे.
आमदार प्रताप सरनाईकांवर ईडीची धाड पडल्यापासून ते माध्यमांसमोर येत नव्हते पण काल या प्रकरणावर बोलताना त्यांनी ‘मी तानाजी मालुसरे यांच्यासारखा धारातीर्थी पडणारा सैनिक नाहीये तर मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे, कुठलंही संकट आलं तर त्याला सामोरं जाण्याची माझी तयारी आहे’ असे खळबळजनक आणि धक्कादायक विधान त्यांनी केलं आहे. आता त्यांच्या या विधानामुळे राजकीय वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे, विरोधी पक्षाने आमदार सरनाईकांवर जोरदार टीकेची झोड उठवली आहे.
Read Also :
‘हे तर स्मशानांचे रखवालदार’, टिळकांच्या विधानांची आठवण देत आशिष शेलारांनी सरकारला सुनावलं
भाजपमध्ये दहापेक्षा जास्त आमदार नाराज, राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती-जयंत पाटील
‘ओवेसीला विकत घेऊ शकेल असा आजपर्यंत कुणी जन्माला आलेला नाही’