नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडतांना दिसत आहेत. यातच दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा तिकीट कापल्यानंतर भाजपचे माजी खासदार हरिचंद्र चव्हाण नाराज होत त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे. यातच पाच वर्षानंतर केंद्रीय राज्यमंत्र्यांना माझी आठवण झाली का ? असा टोलाही हरिचंद्र चव्हाण यांनी विद्यमान खासदार भारती पवार यांना लगावला आहे.
हेही वाचा…लोकशाहीच्या महापर्वाला आजपासून सुरूवात, राज्यात पाच मतदारसंघात आज मतदान
२०१९ प्रमाणे २०२४ ला देखील भाजपने पुन्हा हरीचंद्र चव्हाण यांना डावलून भारती पवारांना उमेदवारी दिली. त्यानंतर चव्हाण भाजपवर प्रचंड नाराज झालेत. तर त्यांनी मध्यंतरी शरद पवारांची देखील भेट घेतली होती. यातच आता भारती पवार यांच्याकडून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर चव्हाणांनी पवारांना टोला हाणला आहे.
हेही वाचा…मोहोळांच्या प्रचारात मनसे सक्रीय ; भाजपा मनसे पदाधिकाऱ्यांची प्रचार नियोजन बैठक संपन्न
यातच पाच वर्षानंतर चव्हाण यांना दिंडोरी लोकसभेच्या पक्षातील कार्यक्रमात समावून न घेणे, होल्डिंगरवर फोटो न टाकणे, पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसंदर्भात विश्वासात न घेणे. विकास कामांमधील चर्चांमधून वगळणे अशा अनेक राजकीय कुरघोड्या हरिचंद्र चव्हाण यांच्यासोबत भाजपने केल्याचा थेट आरोप चव्हाण यांनी केलाय. यातच चव्हाण यांनी थेट अपक्ष उमेदवारी करणारच अशी ठाम भूमिका देखील घेतलीय.
READ ALSO :
हेही वाचा…Live Ajit Pawar | अर्चना पाटलांच्या प्रचारासाठी अजित पवार धाराशिवमध्ये, लाईव्ह सभा
हेही वाचा…कॉंग्रेसने कायम प्रभू श्रीरामाला विरोध केलाय. मोहोळांचा घणाघात
हेही वाचा…धाराशिव मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलली, कॉंग्रेसच्या बड्या नेत्याचा भाजपात प्रवेश