मुंबई: मराठा आरक्षण सुप्रिम कोर्टाने रद्द केल आहे. त्यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात खळबळ सुरु आहे. एकीकडे राज्य सरकारने राज्यपालांना आरक्षणाच्या प्रश्नाबाबत निवेदन दिलं आहे. तर दुसरीकडे विरोधकांचं टीकाकारण सुरुच आहे. त्यामुळे मराठा समाजाला खोटी आश्वासने देवून एप्रिल फूल करण्याचा प्रयत्न करून नका, असे म्हणत भाजपा नेते आशिष शेलार यांनी आता सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.
महाविकास आघाडीमध्ये सगळं हास्यास्पद सुरु असल्याची टीका त्यांनी केली आहे. त्याचबरोबर सरकारनं सर्वोच्च न्यायालयासमोर मराठा आरक्षणातले महत्त्वाचे मुद्दे नीट मांडले नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
राज्य सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे. समाजाला एप्रिल फूल करण्याचा कार्यक्रम करु नका मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोच चव्हाण यांनी आरक्षणाचं जाऊ द्या, सवलती द्या अशी भूमिका घेतली आणि काल मंत्री राज्यपालांची भेट घेताना आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा केली. या त्यांच्या भूमिकेमुळे आता तुम्हाला आरक्षण नक्की द्यायचं आहे की नाही?, असा प्रश्न निर्माण होत आहे. हे सरकार मराठा समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
मराठा आरक्षणाबद्दलच्या गायकवाड अहवालाचं भाषांतर करण्यात आलं नाही आणि त्यामुळे या अहवालातले प्रमुख मुद्दे योग्य पद्धतीने समोर आले नाहीत. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द करण्याचा पवित्रा घेतला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतीच सुसूत्रता नाही, अशी टीका त्यांनी यावेळी केली. Maratha community