गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागात तब्बल 777 कोटींची रस्ते व पुलांच्या कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन आज व्हर्च्युअल सोहळ्याच्या माध्यमातून करण्यात आलं. दिल्लीहून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाले .
जिल्ह्यातील नक्षलवादाचा कणा मोडण्यासाठी राज्य सरकारनं विकासावरच अधिक भर दिला आहे. विकासाची फळे स्थानिक जनतेला मिळू लागल्यावर आपसूक नक्षलवादाचा प्रभाव कमी होईल, असं प्रतिपादन राज्याचे नगरविकासमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
प्राणहिती नदीवरील निजामाबाद सिरोंचा असरअल्ली जगदलपूर राष्ट्रीय महामार्ग 63 वरील पूल कामाची किंमत 168 कोटी, इंद्रावती नदीवरील पातागुडम जवळील 248 कोटींचा पूल, लंकाशेनू येथील बेजूरपल्ली परसेवाडा देवलमारी अहेरी यांना जोडणारा 7.71 कोटींचा पूल, बेजूरपल्ली परसेवाडा देवलमारी अहेरी या राज्य महामार्गाची दुरुस्ती 25.81 कोटी, गारंजी पुस्तोला रस्त्याची 35.62 कोटी रुपयांची दुरुस्ती या कामांचं लोकार्पण करण्यात आलं तर पेरीमिली नदीवरील नारायणपूर भामरागड आलापल्ली रस्त्यावरील पूल 43.23 कोटी, बांडीया नदीवरील नारायणपूर भामरागड आलापल्ली रस्त्यावरील पूल 72.59 कोटी, पर्लकोटा नदीवरील नारायणपूर भामरागड आलापल्ली रस्त्यावरील पूल 77.98 कोटी, वैनगंगा नदिवरील तेलंगणा सीमा ते कोरपना, गडचांदूर, राजूरा, बाम्नी, आष्टी जोडणारा पूल 98.83 कोटी असा कामांचं भूमिपूजन करण्यात आले.