दिल्ली : सोमवारी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सलग सहाव्या दिवशी वाढ झाली. पेट्रोल ३० पैशांनी, तर डिझेलच्या किंमती २६ पैशांनी वाढल्या आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सहाव्या दिवशी वाढ झाल्याने अनेक उच्चांक गाठले आहेत. इंधनाचे दर वाढल्याने सर्वसामान्य त्रस्त असताना केरळचे भाजपा अध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी मात्र लोकांना त्याची चिंता नसल्याचं म्हटलं आहे. “मतदारांना इंधनाच्या किंमती वाढल्याची काळजी नाही आणि दरवाढीमुळे निवडणुकांवर परिणाम होणार नाही,” असे त्यांनी म्हटले आहे.
केरळमध्ये सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू आहे. त्यावेळी के. सुरेंद्रन यांनी हे वक्तव्य केले आहे. काँग्रेस पक्षानेच तेल कंपन्यांना किंमती ठरवण्याचा अधिकार दिल्याने ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप के. सुरेंद्रन यांनी केला आहे. “देशात इंधनाच्या किंमती वाढल्याची लोकांवर परिणाम होणार नाही आणि त्यामुळे हा निवडणूकीचा मुद्दा नाही,” असे के. सुरेंद्रन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
यूपीए सरकारच्या काळात इंधन दरवाढीविरोधात सुरेंद्रन यांनी विरोध दर्शवला होता. त्याबाबत पत्रकारांनी विचारले असता, आज ती भूमिका घेण्यास विरोधी पक्षात इतरही लोक आहेत असे ते म्हणाले. ‘आम्ही लोकांसाठी मोफत तांदूळ, स्वयंपाकासाठी गॅस, स्वस्त औषध, किसान सन्मान निधी आणि इतर सोई सुविधा पुरवत आहोत त्यामुळेच आम्ही देशातील सर्व निवडणुका जिंकत आहोत,” असेही ते म्हणाले.
यूपीएच्या काळात देशात पेट्रोलची किंमत ८७ रुपये होती आणि आता ती ८३ रुपये इतकी आहे, असा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, यूपीएच्या काळात पेट्रोलचे दर ६७ रुपये होते असे पत्रकारांनी सांगितले असता के. सुरेंद्रन यांनी ही माहिती फेटाळून लावली
Read Also :
‘मोठ्या संख्येने आंदोलन करणारे शेतकरी वेडे आहेत का?’, काँग्रेस नेत्याचं संतापजनक विधान
…तर फडणवीस शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतील, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
‘शिवसेनेला शेतीतलं काय कळतं?,फक्त मोदींच्या विरोधासाठी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा’
‘आता तुम्ही हिमालयात जाणार का?’ पत्रकरांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटलांचं मौन