पुणे : निवडणुकीत महाआघाडी एकत्र लढली तर त्यांच्यात किती बंडखोरी होईल याचा विचार करा. मात्र, आघाडी म्हणून ते कसेही लढले तरी आम्ही मात्र, स्वतंत्रपणे लढणार आहोत. स्वतंत्रपणे लढण्याची आमची तयारी आणि इच्छादेखील आहे.निवडून आल्यानंतर पुन्हा आम्हाला फसवणूक नको आहे. त्यामुळे स्वतंत्र लढणे अधिक हिताचे आहे, असे परखड मत भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
एका वृत्त समूहाला दिलेल्या मुलाखतीत चंद्रकांत पाटील म्हणाले, या सरकारमध्ये समन्वय नाही. त्याचा परिणाम सर्वोच्च न्यायालयातील निकालावर झाला. परिणामी त्याचा फटका राज्यातील लाखो मराठा तरूणांना सहन करावा लागत आहे. शिक्षण आणि नोकरीच्या अनेक संधी मराठा तरूणांच्या हातातून जात आहेत. किमान आरक्षणाच्या विषयात तरी आघाडीतील तीन्ही पक्षांनी समन्वय ठेवला असता तर मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात अबाधित राहिले असते.
सरकारमधील मंत्र्यांचा परस्परांशी समन्वय नाही. त्यामुळे न्यायालयात भूमिका मांडताना गोंधळा झाला. त्यातून आरक्षण स्थगितीपर्यंतचा निर्णय झाला. भाजपा सरकारच्या काळात आरक्षणाचा विषय पक्ष आणि सरकारच्या सर्वोच्च प्राधान्याचा विषय होता. सरकार सर्वोच्च न्यायालयात आलेले अपयश आमच्यावर आरोप करून झाकू शकत नाही असेही यावेळी पाटील म्हणाले.
Read also
पवार साहेबांनी अनुपस्थित राहणे म्हणजे कृषी विधेयकाला मूकसंमती…https://t.co/B3ZW4yZ65h#SharadPawar #NCP #KisanBill2020 @Sadabhau_khot
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 26, 2020