मुंबई : राज्यात आता महाराष्ट्रातून बाहेर गेलेल्या प्रकल्पाबाबत राज्यात एकच चर्चा सुरू झाली आहे. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदमध्ये पुराव्यासह महाविकास आघाडीवर घणाघात चढवला. त्यालाच आता शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच त्यांनी फडणवीसांना वन टू वन डिबेट करण्याचं आवाहन देखील दिलं आहे.
महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरला मंजरी..! विरोधकांच्या टिकेला फडणवीसांचं उत्तर
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प आणि एअरबस प्रकल्पाबाबत मला अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की, महाविकास आघाडी सरकार असताना याठिकाणी वातावरण चांगलं नाही. असं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं. त्यावर आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, मी उपमुख्यमंत्र्यांना चॅलेंज देतो की, ज्या कंपनीच्या अधिकाऱ्याने महाराष्ट्रात वातावरण खराब आहे, असे म्हटले त्याचे नाव सांगावे. कारण आम्हाला कंपनीने सांगितले की, केंद्र जिथे सांगेल तिथे आम्हाला प्रकल्प लावावा लागेल. असंही ते म्हणाले.
आपल्या राज्यातून अनेक उद्योग इतर राज्यात जात आहेत. आकड्यांमध्ये आम्ही काही खेळ करू शकत नाही म्हणून आमचं सरकार पडलं असेल. असंही आदित्य ठाकरे म्हणाले. त्या आधी फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर करण्यात आला आहे. राष्ट्रीय इलेक्टॉनिक्स धोरणातंर्गत महाराष्ट्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 2000 कोटींची भेट म्हणून गुंतवणुक दिली आहे. यामधून 5000 रोजगार निर्मिती होणार आहे. तसेच काही नेते आणि एचएमव्ही पत्रकार महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत. माझा प्रश्न आहे, ज्यांनी रिफायनरीला विरोध केला. त्यांना गुंतवणुकीवर बोलण्याचा काय अधिकार? असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना केला.
Read also
- “माजले होते बोके, कोरोनात खाऊन खोके, आता होणार चौकशी ओके”; शेलारांचा टोला
- 12,000,00,00,000…! या आकड्याची आता CAG कडून चौकशी: चित्रा वाघ यांनी सेनेला डिवचलं
- “काळजी करू नका..! मोदींनी महाराष्ट्राला 2000 कोटींची भेट दिली”; देवेंद्र फडणवीस
- “प्रत्येक प्रकल्प गुजरातलाच का जातो? पंतप्रधानांचा विचार विशाल असायला हवं”; राज ठाकरे
- “शरद पवार यांची तब्बेत बिघडली..! ब्रीच रूग्णालयात दाखल