जळगाव : एकनाथ खडसे यांनी काल भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याचे राजकारण पार ढवळून निघाले आहे. खडसे हे फडणवीस यांनाच लक्ष्य करीत आहे. त्यांनी मला राजकारणातून संपविण्याचा प्रयत्न केल्यामुळेच मी भाजप सोडला कारण या पक्षात आता मला भविष्य उरले नव्हते असे स्पष्ट केले. जळगावमध्ये आपल्या घरातून खडसे यांनी आजही माध्यमांशी संवाद साधला.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत खरे तर भाजप बहुमताने सत्तेवर यायला हवा होता. केंद्रातील मोदी सरकारची कामगिरी होती, शिवसेनेशी युती होती. स्वत: फडणवीस नेतृत्व करीत होते, ते मुख्यमंत्री होते. पण, तिकिट वाटपात त्यांनी जो गोंधळ घातला त्यामुळेच सत्ता येऊ शकली नाही. माझ्यासह प्रकाश मेहतांसारखे सहा सहा टर्म निवडून येणाऱ्यांचे तिकीटे कापली. असे किती तरी नेते आहेत की त्यांना घरी बसविले. तर हक्काच्या निवडूण येणाऱ्या नेत्यांना तिकिटे दिली असती तर पक्षालाच फायदा झाला असता. जागा वाढल्या असत्या की नाही. सत्ता आली असती की नाही ? असा सवाल संतप्त खडसे यांनी केला आहे.
देवेंद्र फडणवीस हे सक्षम नेतृत्व आहे. त्यामुळेच राज्यात पुन्हा सत्ता आली नाही. मी पुन्हा येणार म्हणण्यामध्ये अहंपणा होता असा जोरदार हल्लाबोल ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज पुन्हा एकदा केला आहे.
मात्र, फडणवीस यांच्या हम करेसो कायद्यामुळे भाजपला 123 जागा मिळाल्या. फडणवीस नेतृत्व करू लागल्यापासून त्यांनी खूप चांगल्या गोष्टी केल्या. ज्या भाजपमध्ये माधव पॅटर्न होता तो मोडकळीस निघाला. ज्या ज्या चांगल्या गोष्टी भाजपत होत्या त्या त्यांनी बंद करून टाकल्या त्यामुळेच त्यांचे नेतृत्व सक्षम आहे असे मानावे लागेल.
आजपर्यंत मी शेकडो भाषणं केली मात्र दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांचे नाव घेतले नाही असे कधी झाले नाही असे सांगताना पंकजा मुंडेही पक्ष सोडणार का ? याविषयी खडसे म्हणाले, की मला याबाबत काहीही बोलायचे नाही. नो कंमेन्ट्स !
Read Also
माझ्या संपर्कात १० आमदार आणि… राष्ट्रवादीत गेलेल्या खडसेंचा गौप्यस्फोटhttps://t.co/lQt4ZWGkor#Eknathkhadase #NCP #BJP
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 22, 2020