हिंगोली : अतिवृष्टीमुळे शेकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे राज्यातील सर्वच महत्वाचे नेते सध्या दौरे करून नुकसानीची पाहणी करत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील साळना येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे. यावेळी शेतकऱ्यांनी सरकार विरोधातील तीव्र नाराजी फडणवीस यांच्यासमोर व्यक्त केली आहे.
मुलगी लग्नाला आली, पिकांचे असे झालेले नुकसान पाहून मी फाशी घ्यायचा विचार केलता असे गाऱ्हाणे साळना येथील एका शेतकऱ्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सांगितले आहे.देवेंद्र फडणवीस हे सध्या अतिवृष्टी झालेल्या ठिकाणांची पाहणी करत आहेत आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची व्यथा जाणून घेत आहेत.
यावेळी शेतकऱ्यांनी ठाकरे सरकारबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेनेच्या सरकारच्या तोंडावर पाणी मारून त्यांना झोपेतून उठवा आणि ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
फडणवीस यांच्याप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील हे देखील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करत आहेत. उस्मानाबाद येथील शेतकऱ्यांची भेट घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलासा देण्याचे काम केले.
CM ठाकरे म्हणतात जे करू तुमच्या सुखासाठी
शेतकऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. पुढील दोन दिवसांत मंत्रीमंडळ बैठक होईल. जवळपास ८० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. लवकरात लवकर आयुष्य पुन्हा उभं करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार वचनबद्ध आहे. आकडे लावण्यासाठी मी आलेलो नाही. जे करु तुमच्या सुखासाठी करु. धीर सोडू नका, खचून जाऊ नका,” असं उद्धव ठाकरे यांनी तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथे त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हटलं होतं.
Read Also
PM मोदींना दारुड्या म्हणणाऱ्या प्रकाश आंबेडकरांचा भाजपकडून समाचार ! चंद्रकांत पाटील यांनी केले 'हे' ट्विट https://t.co/Phc0ShiiqA#PMModi #PrakashAmbedkar #ChandrkantPatil@ChDadaPatil @Prksh_Ambedkar
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 21, 2020