दिल्ली : केंद्र सरकारच्या शेतकरी विधेयकांना देशभरातून विरोध होताना दिसत आहे. हि विधेयके रद्द करण्याच्या मागणीसाठी मागील काही दिवसांपासून शेतकरी दिल्ली बॉर्डरवर आंदोलन करत आहेत. देशभरातून विविध नेत्यांचा आणि पक्षांचा या आंदोलनाला पाठिंबा मिळत असून महाराष्ट्रातून देखील या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठाकरे सरकारचा पहिला मंत्री पोहोचला आहे. राज्यमंत्री बच्चू कडू आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झाले असून अनेक अडथळ्यानंतर त्यांना या ठिकाणी पोहोचण्यास यश मिळाले आहे.
कृषी कायदे रद्द करण्यासाठी आता शेतकऱ्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. सध्या केंद्र सरकारने लागू केलेले कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे नसून कॉर्पोरेटच्या हिताचे आहेत असं शेतकऱ्यांनी म्हटलं आहे. भारतीय किसान युनियनने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. मोदी सरकारने आणलेले कायदे हे शेतकरी हिताचे नाहीत असं त्यांनी आता सुप्रीम कोर्टाला सांगितलं आहे.
Bhartiya Kisan Union approaches the Supreme Court against the three #FarmLaws passed by the Parliament, claiming the laws will make farmers “vulnerable to corporate greed.” pic.twitter.com/esoIjC3vfB
— ANI (@ANI) December 11, 2020
त्यामुळे आता कृषी कायद्यांचं काय होणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या १६ दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. परवाच विरोधी पक्षातल्या पाच नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती आणि कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली. कृषी कायदे तातडीने रद्द करण्यात यावेत अशी शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे. त्यासाठी ऐन कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे.
काही दिवसांपूर्वी राज्यमंत्री बच्चू कडू आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह दुचाकीवरून दिल्लीसाठी रवाना झाले होते. परंतु अनेक ठिकाणी त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. काल उत्तरप्रदेशमध्ये गेले असता पोलिसांनी त्यांचा ताफा अडवत त्यांना दिल्लीच्या दिशेने जाण्यास मनाई केली. त्यानंतर हरियाणामध्ये देखील त्यांना पोलिसांनी रोखले. मात्र मजल दरमजल करत अखेर ते पलवलमध्ये दाखल झाले आहेत. त्यांनी कालची रात्र रस्त्यावर झोपून काढली असून आज सकाळी ते आंदोलनस्थळी जाणार आहे.
मागील काही दिवसांपासून शेतकरी आपल्या मागण्या घेऊन याठिकाणी आंदोलन करत आहेत. हि तिन्ही शेती विधेयके रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बच्चू कडू यांनी ज्याठिकाणी झोपून रात्र काढली त्याठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे.याठिकाणी चारशे ते पाचशे ट्रॅक्टरचा ताफा लागलेला आहे.
Read Also :
‘महाराष्ट्रात महाविकास आघाडी झाली त्याप्रमाणे केंद्रात आघाडी…,’ संजय राऊतांचं सूचक विधान
‘…तर कधी चड्डा, नड्डा, फड्डा, भड्डा’, ममता बॅनर्जींनी उडवली भाजप नेत्यांची खिल्ली
यूपीएची ‘पॉवर’फूल खेळी… सोनिया गांधींच्या जागी शरद पवारांना मिळणार अध्यक्षपद?