मुंबई : महामारीच्या आकस्मिक संकटाने आधीच शेतकरी राजाचे कंबरडे मोडले असताना, आता रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या मुश्किलीत सापडला आहे. परंतू रासायनिक खतांच्या किंमती केंद्र सरकारने वाढवल्या नाहीत. तर त्या कंपन्यांनी वाढवल्या असून त्याच्या तात्काळ दखल केंद्र सरकारकडून घेण्यात आली आहे. लवकरच खतांच्या किंमती स्थित होतील, असा दावा आमदार सदाभाऊ खोत यांनी केला आहे.
भारतातील सर्वाधिक मोठ्या खत उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या इफ्को (Indian Farmers Fertiliser Cooperative Limited ) कंपनीच्या मार्केटिंग विभागाकडून ७ एप्रिलला एक पत्रक जारी करण्यात आलं होतं. या पत्रकात कंपनीनं खतांचे नवे दर जाहीर केले होते आणि हे जर १ एप्रिलपासून लागू होतील, असं म्हटलं होतं. हे दर आधीच्या दरांच्या तुलनेत अधिक होते. रासायनिक खतांच्या वाढत्या किमती हा राज्यभरातल्या शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात खते उपलब्ध करून देण्यासाठी पावलं उचलत असल्याचं भारत सरकारच्या रसायन आणि खत मंत्रालयानं म्हटलं आहे.
आधीच कोरोनाच्या संकटाने शेतकरी होरपळून निघालेला आहे. त्यातच आता रासायनिक खतांच्या किंमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या मुश्किलीत सापडला आहे. परंतू रासायनिक खतांच्या किंमती केंद्र सरकारने वाढवल्या नाहीत. तर त्या कंपन्यांनी वाढवल्या असून त्याच्या तातडीने दखल केंद्र सरकारकडून घेण्यात आली आहे. लवकरच खतांच्या किंमती स्थित होतील. शेतकऱ्याला परवडेल असा भाव ठेवण्यात येईल, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले आहे.
ते म्हणाले, माझे खत कंपन्यांशी बोलने झाले आहे. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. केंद्र सरकार आणि रसायन मंत्री यांच्याशी बोलने झाले असून लवकरच यावर निर्णन घेण्यात येणार आहे. परंतू महाराष्ट्रातील काही विरोधकांकडून रासायनिक खतांच्या वाढीव किंमतूवरून जाणिव पुर्वक राजकारण करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.