पटना : बिहार विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार आणि जेडीयूला झटका द्यायचा होता, ते मिशन फत्ते झालं, अशी प्रतिक्रिया लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष रामविलास पासवान यांचे पुत्र चिराग पासवान यांनी निकालानंतर दिली. काही जण निवडणुकीआधी आमची लायकी काढत होते, त्यांना आम्ही एकट्याने निवडणूक लढवून उत्तर दिलं, अशी चपराकही चिराग पासवान यांनी लगावली.
माझा भाजपला फायदा झाला, त्यांच्या जागांवर आमचा पाठिंबा होता. केंद्र आणि राज्याच्या राजकारणात युती-आघाडी समीकरणे वेगळी असतात. इथे आठवले यांचा पक्ष निवडणूक लढवतो. पण आमचा काही आक्षेप नसतो. गुजरातमध्येही नितीशजी निवडणूक लढवतात. माझं आणि माझ्या खासदारांचे पूर्ण समर्थन मोदीजींना असेल, असं चिराग पासवान यांनी स्पष्ट केलं.
गेले दीड वर्षे माझं नितीशकुमार यांच्याशी बोलणं झालेलं नाही. त्यांनी संवाद तोडला म्हणून त्यांचं नुकसान झालं. तरीही मुख्यमंत्रिपदासाठी त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. नव्या जनाधाराच्या मदतीने 2025 च्या निवडणुकीला लोकजनशक्ती पार्टी सामोरे जाईल, असं चिराग पासवान म्हणाले.
दरम्यान बिहारचे निकाल वेगळे लागले असले तरी तेजस्वी यादव यांची झुंज कौतुकास्पद आहे. सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तेजस्वी यादव यांचं कौतुक केलं आहे. यासंबंधी जयंत पाटील यांनी एक ट्वीट केलं आहे.
Read Also :
स्वतःचा कचरा केल्याबद्दल शिवसेनेचं परत एकदा अभिनंदन…”, राणेंची टीका
…म्हणून जयंत पाटलांनी ‘तेजस्वी यादवां’वर उधळली स्तुतिसुमने
सत्तेचा माज सोडून मराठा तरूणांच्या भविष्याचा विचार करा अन्यथा मराठा रस्त्यावर उतरला तर इतिहास घडेल…