मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल हाती आला असून त्यात भाजपप्रणीत आघाडीने बहुमत मिळवले असून तरीही विरोधी पक्षाकडून राजद नेते तेजस्वी यादवांच मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून आता त्यात मंत्री जयंत पाटलांनी आघाडी घेतली आहे. याआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते खासदार संजय राउत यांनी तेजस्वी यादवांच कौतुक केल होत.
तेजस्वी यादव यांच्याकडून युवकांनी प्रेरणा घ्यावी असे सांगतानाच जयंत पाटील यांनी अभिनंदन ! Well done असे ट्वीट करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, जयंत पाटील यांनी ‘मेरे हार की चर्चा होगी जरूर मैंने जीत के बाजी हारी है ।’ अशी शायरी सादर करत तेजस्वी यादव यांना प्रोत्साहन दिलं आहे.
मेरे हार की चर्चा होगी जरूर
मैंने जीत के बाजी हारी है ।बिहारचे निकाल वेगळे लागले असले तरी तेजस्वी यादव यांची झुंज कौतुकास्पद आहे. सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे. युवकांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी.
अभिनंदन ! Well done @yadavtejashwi pic.twitter.com/gYQw5JfXPH— Jayant Patil (@Jayant_R_Patil) November 11, 2020
बिहारचे निकाल वेगळे लागले असले तरी तेजस्वी यादव यांची झुंज कौतुकास्पद आहे. सत्ताधीशांना शेवटच्या क्षणापर्यंत घाम फोडला यातच तेजस्वी यांचा विजय आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तेजस्वी यादव यांचं कौतुक केलं आहे. यासंबंधी जयंत पाटील यांनी एक ट्वीट केलं आहे.
Read Also :
सत्तेचा माज सोडून मराठा तरूणांच्या भविष्याचा विचार करा अन्यथा मराठा रस्त्यावर उतरला तर इतिहास घडेल…
फटाकेबंदी म्हणजे ‘हिंदू धर्मविरोधी कार्य’, करणी सेनेचा आरोप
अर्णब गोस्वामीचा कारागृहातील मुक्काम वाढला..जाणून घ्या न्यायालयात काय घडलं
अर्णबवर कारवाई का झाली, याचा अभ्यास भाजपने केला नाही, जयंत पाटलांचे चंद्रकांतदादांना प्रत्युत्तर