मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी एक पत्रक काढून महाविकास आघाडी सरकारवर टीका केली होती. आता त्याला मंत्री जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. घरात बसून चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करून काय भूमिका व्यक्त केली, यावर मी प्रतिक्रिया व्यक्त करण्याची काही आवश्यकता आहे, असं वाटत नाही, अर्णव गोस्वामी यांच्यावर कारवाई का झाली, याचा अभ्यास भाजपने केलेला दिसत नाही, अशा शब्दांत टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
महाविकास आघाडीने मराठा तरुणांचा विश्वासघात करण्याचा प्रश्नच नाही. मराठा समाजाचं आरक्षण टिकावं यासाठी, आम्ही प्रयत्न करत असल्याचं जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीसाठी आमची शिफारस यादी राज्यपालांकडे दिली आहे. यावर पुढील 15 दिवसांत निर्णय घ्यावा, अशी विनंती राज्यपालांना सरकारनं केल्याची माहिती जयंत पाटील दिली आहे. राज्यपाल लवकरच यादीला मंजुरी देतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.
सर्वांचीच इच्छा आम्ही पूर्ण करू शकत नाही
आमदारकीसाठी अनेकजण इच्छूक होते. मात्र, सर्वांचीच इच्छा आम्ही पूर्ण करू शकत नाही, असंही जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं. ज्यांना संधी मिळाली नाही ते नाराज असणं स्वाभाविक आहे, पण त्यांची नाराजी आम्ही दूर करू, असं जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं.
Read Also :
सत्तेचा माज सोडून मराठा तरूणांच्या भविष्याचा विचार करा अन्यथा मराठा रस्त्यावर उतरला तर इतिहास घडेल…
फटाकेबंदी म्हणजे ‘हिंदू धर्मविरोधी कार्य’, करणी सेनेचा आरोप
अर्णब गोस्वामीचा कारागृहातील मुक्काम वाढला..जाणून घ्या न्यायालयात काय घडलं