मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून तिसरं समन्स बजावण्यात आलंय. त्यात देशमुख यांना आज ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशावेळी ईडीचा ससेमिरा रोखण्यासाठी आता अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय. तशी माहिती देशमुख यांच्या वकिलांनी दिली आहे. आपल्याविरोधात कारवाई करु नये म्हणून ही याचिका दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिलीय.
हे पण वाचा: पावसाळी अधिवेशन ‘या’ मुद्द्यांवर गाजणार, प्रस्तावित विधेयकांची यादी जाहीर
हे पण वाचा: महाविकास आघाडी सरकार कडून पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवसांचं! भाजपकडून जोरदार टीका
अनिल देशमुख यांच्या वकिलांनी याबाबतची माहिती दिली आहे. आपल्याविरोधात कोणत्याही प्रकारची सक्तीची कारवाई केली जाऊ नये. त्यापासून संरक्षण मिळावे, यासाठी अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती मिळाली आहे. यापूर्वी ईडीने अनिल देशमुख यांना दोन वेळा समन्स बजावत प्रत्यक्ष चौकशीसाठी बोलावले होते. मात्र, वय, आजारपण आणि कोरोना यांचे कारण देत अनिल देशमुख यांनी प्रत्यक्ष चौकशीला हजर राहण्यास नकार दिला होता. यानंतर ईडीकडे प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी वेळ मागितली होती. ती मुदत ५ जुलै रोजी संपुष्टात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता सक्तीच्या कारवाईपासून संरक्षण मिळावे, यासाठी अनिल देशमुख यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे सांगितले जात आहे.
हे पण वाचा: राष्ट्रवादी काँग्रेसची महत्व पूर्ण बैठक; पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांची निवड नाही?
सुपुत्र ऋषीकेश देशमुख यांनाही समन्स
अनिल देशमुख यांचे सुपुत्र ऋषीकेश देशमुख यांनादेखील समन्स बजावण्यात आले असून त्यांनाही ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वी अनिल देशमुख यांनी दोन वेळा चौकशीसाठी प्रकृती आणि कोरोनाच्या कारणास्तव उपस्थित राहू शकत नसल्याचे म्हटले होते. तसेच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी करण्याची विनंती केली होती. मात्र, अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा ईडीने समन्स बजावले असून त्यांना ५ जुलै रोजी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे अनिल देशमुख यांचे सुपुत्र ऋषीकेश देशमुख यांना ६ जुलै रोजी ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.
हे पण वाचा: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून तिसरं समन्स, सोमवारी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश
हे पण वाचा: ईडीच्या कारवाईनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया; देशमुख म्हणतात…
दरम्यान, एप्रिल महिन्यात अनिल देशमुख यांची सीबीआयने चौकशी केली होती. त्यानंतर आता ईडीने चौकशी सुरू केली आहे. ईडीने देशमुख यांच्या पाच ठिकाणांवर छापेमारी केली. त्यानंतर ईडीने देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक केली.