मुंबई : राज्यात सध्या मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण, कंत्राटी परिचारिकांचा मुद्दा, आशा वर्कर्सच्या वेतनाचा मुद्दा, नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावरून सुरु असलेला वाद, प्रताप सरनाईक आणि अनिल परब यांच्यावरच होत असलेले आरोप आणि सुरु असलेल्या चौकश्या, सचिन वाझे-मनसुख हिरेन-प्रदीप शर्मा-अँटिलीया स्फोटकं प्रकरण, तौक्ते चक्रीवादळ, लसीकरण मोहीम, महामारी हे मुद्दे गाजत आहेत.
हे पण वाचा, हे जेनतेच्या हिताच सरकार आहे की तमाशा आहे? – देवेंद्र फडणवीस
या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी आणि सरकारला यावरून जाब विचारण्यासाठी विरोधी पक्ष असलेल्या भाजपने, राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन कमीत कमी १५ दिवसांचं घेण्यात यावं, अशी मागणी केली होती. मात्र, या मागणीला भीक न घालता राज्य सरकारने, पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवसांचं घेण्याचा निर्णय घेतला आहे. ५ आणि ६ जुलै रोजी राज्य विधिमंडळाचं अधिवेशन होणार असून, विशेष म्हणजे अधिवेशनाच्या कामकाजातून प्रश्नोत्तर, तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी आदी वगळण्यात आल्या आहेत.
हे पण वाचा, “राष्ट्रमंच’ हा केवळ बातमीत राहण्यापुरता केलेला केविलवाणा आणि नवा हास्यास्पद प्रयोग”
त्यामुळे, राज्य सरकारच्या या दोन दिवसांच्या अधिवेशनाच्या निर्णयावर, विरोधकांनी सडकून टीका केली असून, “महामारीचा आजार गंभीर आहे, हे मान्य आहे. त्याबद्दल सर्व प्रकारची काळजी घेतली पाहिजे, हे ही मान्य आहे. यात आम्हीही ठाकरे सरकारला मदत करतोय. पण, महामारीचा बहाणा करून पावसाळी अधिवेशन घ्यायचंच नाही, असा प्रयत्न आघाडी सरकार करत आहे. एकीकडे हजारोंच्या उपस्थितीत कार्यालयाचं उद्घाटन होऊ शकतं. दुसरीकडे बारमध्ये कितीही लोक गेले तरी चालतं; मग अधिवेशन का नको? या सरकारची मानसिकता चुकीची आहे, आमचा याला विरोध आहे आणि त्यामुळे कामकाज समितीतून आम्ही बाहेर पडलो आहे,” असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं.
Read Also :
- महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आलं आहे का? पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…
- शरद पवारांच्या पे रोलवर राहण्यापेक्षा शिवसैनिकांच्या व्यथा मांडा; चंद्रकांतदादांचा राऊतांना सल्ला
- राज्यात मांडीला मांडी, पण दिल्लीत पवारांच्या बैठकीला दांडी; संजय राऊत म्हणतात…
- चद्रकांत पाटील म्हणाले; जयंतराव असा त्रास देणे तुम्हाला शोभत नाही
- भाजपाला सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठीच; महाविकास आघाडी पाच वर्षे टिकवणे महत्वाचे