मुंबई : देशात आणि राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेस-भाजपने स्वबळाची नारा दिला आहे, तर शिवसेना-राष्ट्रवादी त्यांची आघाडी तयार करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे प्रताप सरनाईक आणि शिवसेनेतल्या आणखी काही नेत्यांची भाजपसोबत जुळवून घेण्याची इच्छा जाहीररीत्या बाहेर आली आहे, तर शिवसेनेकडून भाजपचे नगरसेवक फोडले जात आहेत.
हे पण वाचा, राजकीय खलबतं सुरु ; फडणवीस आणि पाटील यांची तासभर बंद दाराआड चर्चा
कालच देशाच्या आणि राज्याच्या दृष्टीने झालेली सर्वात महत्वाची घडामोड म्हणजे, शरद पवारांनी भाजप-काँग्रेसविरोधात असलेल्या पक्षांची तिसरी आघाडी तयार करण्याच्या दृष्टीने सुरुवात केली असून, आज होणाऱ्या या नवीन ‘राष्ट्रमचं’ च्या आघाडीच्या बैठकीत, काही महत्वाचे निर्णय आणि घडामोड घडण्याची शक्यता आहे.
हे पण वाचा, राज्य सरकारला २१ दिवासाचे अल्टीमेटेम; संभाजीराजेंची घोषणा
या पार्शभूमीवर काल, NDTV चे संपादक राजदीप सरदेसाई यांनी, काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांना, राज्यातील काँग्रेसचा स्वबळचा नारा, शिवसेना आणि शरद पवारांचा राष्ट्रीय मंच याबद्दल प्रश्न विचारण्यात आले. या सर्व प्रश्नांची त्यांनी सडेतोड उत्तरे दिली आहेत.
राज्यातील आघाडी सरकार धोक्यात आलं आहे का?
मला वाटत नाही, राज्यातलं हे महाविकास आघाडीचं सरकार, राज्यात भाजपला सत्तेपासून लांब ठेवण्यासाठी स्थापन झालं असून, या आघाडीत असलेल्या सर्वच घटक पक्षांचा एकच उद्देश आहे. आमचा पक्ष काही जिल्ह्यात नक्कीच कमकुवत आहे. त्यामुळे त्यादृष्टीने आम्ही त्या जिल्ह्यांमध्ये पक्ष बांधणी सुरु केली आहे. मात्र, सरकार धोक्यात आहे, असं मला वाटत नाही.
पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचा असावा, याबाबदल तुम्हाला काय वाटतं?
सध्या राज्यात काँग्रेस क्रमांक चारचा पक्ष आहे. आम्हाला नक्कीच क्रमांक एकचा पक्ष व्हायची इच्छा आहे, आणि असं वाटत असेल तर मला नाही वाटत त्यात काही चुकीचं आहे, उद्या जर आमच्या आमदारांची संख्या जास्त असेल, तर राज्यात नक्कीच आमचा मुख्यमंत्री होईल, आत्तापर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांच्या वेळी हीच पद्धत राहिली आहे.
काँग्रेस-शिवसेनेत वैचारिक मतभेद आहेत, हे खरं आहे का?
या मुद्द्याकडे तुम्ही अनेक नजरांनी पाहू शकता. पण एवढं नक्की सांगतो; की राज्यातलं आघाडी सरकार, एका विशिष्ट हेतूने तयार करण्यात आलं आहे. एकवेळ आम्ही शिवसेनेची विचारसरणी सहन करु शकतो. पण भाजपची कधीही नाही.
शरद पवार भाजपविरोधी पक्षांची मोट बांधत आहेत, यात काँग्रेसची नक्की काय भूमिका आहे?
शरद पवार जर भाजपविरोधात नवीन आघाडी उघडत असतील, तर हे नक्कीच स्वागतार्ह आहे. त्यांनी त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी काही नेत्यांची बैठक बोलावली आहे. नक्कीच भाजपविरोधी अशा सर्व पक्षांनी एकत्र आलं पाहिजे. मात्र, आम्हाला त्याची चिंता का असावी?
Read Also :
- साई रिसॅार्टचे मालक अनिल परबच! परबांच्या अडचणीत वाढ
- निवडणुकीत पत्ता कट केलेल्या भाजपच्या मेधा कुलकर्णींचे अखेर राजकीय पुनर्वसन
- शरद पवारांच्या पे रोलवर राहण्यापेक्षा शिवसैनिकांच्या व्यथा मांडा; चंद्रकांतदादांचा राऊतांना सल्ला
- चद्रकांत पाटील म्हणाले; जयंतराव असा त्रास देणे तुम्हाला शोभत नाही
- भाजपाला सत्तेपासून बाजूला ठेवण्यासाठीच; महाविकास आघाडी पाच वर्षे टिकवणे महत्वाचे