मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांच्या बैठकीचं आयोजन केलं आहे. या बैठकीपासून शिवसेना अलिप्त असल्याने तर्कवितर्कांना उधाण आलं होतं. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पडदा पाडला आहे. पवारांकडे होणारी बैठक विरोधी पक्षाची बैठक नाही. ही बैठक राष्ट्रमंचच्या नेत्यांची आहे. तेवढंच या बैठकीला महत्त्व आहे. त्यामुळे बैठकीला जाण्याचा प्रश्नच येत नाही, असं सांगतानाच काँग्रेस आणि शिवसेनेशिवाय तिसरी आघाडी होऊ शकत नाही, असा दावाही संजय राऊत यांनी केला.
हे पण वाचा, प्रशांत किशोर- शरद पवार यांच्यात खलबतं सुरु, राज्यात लवकरच राजकीय वादळ?
शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधकांची बैठक होणार आहे. या पार्श्वभूमीवर संजय राऊत मीडियाशी बोलत होते. तुम्हाला कुणी सांगितलं ही विरोधी पक्षाची बैठक आहे? या बैठकीला काँग्रेस, समाजवादी पार्टी, बसपा, चंद्राबाबू नायडू, चंद्रशेखर राव कुठे आहेत? त्यांची काय वेगळी तिसरी आघाडी आहे का? असा सवाल करतानाच ही यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रमंचची बैठक आहे. त्यापलिकडे या बैठकीचं महत्त्व वाटत नाही, असं राऊत म्हणाले.
हे पण वाचा, शरद पवार दिल्लीला रवाना, विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटणार; राजकीय वर्तुळात चर्चेला उधान
आजच्या बैठकीत काही महत्त्वाचं होईल असं वाटत नाही. पवार मोठे नेते आहेत. विविध क्षेत्रातील अनेक लोक त्यांचा सल्ला घेण्यासाठी येत असतात. काल माझं पवारांशी फोनवर बोलणं झालं. आजची बैठक ही यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रमंचची आहे. त्यांचे काही मुद्दे आहेत. त्यावर चर्चा होणार आहे. देशातील विरोधी पक्षांची ही बैठक नाही. फार फार तर मजबूत विरोधी पक्ष स्थापन करण्याची ही पहिली पायरी आहे, असं म्हणता येईल, असंही त्यांनी सांगितलं. मोदी विरोधी, भाजप विरोधी असे शब्द वापरणं योग्य नाही. देशाला मजबूत विरोधी पक्षाची गरज आहे. विरोधी पक्ष प्रबळ करणं हे गरजेचं आहे. पवार तेच करत आहेत. त्यामुळे मोदी विरोधी, भाजप विरोधी असे शब्द वापरणं चुकीचं आहे, असं सांगतानाच काँग्रेस, शिवसेनेशिवाय देशात तिसरी आघाडी होऊ शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
Read Also :
- संघ भाजपच्या बैठका; योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात भाजप आमदाराची नाराजी
- बाळासाहेबांच्या बोटाला धरून भाजपा राज्यात वाढला त्याचा शिवसेनेला त्रास !
- “आमदार सरनाईक आणि त्यांचा लेटरबॉम्ब हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न”- देवेंद्र फडणवीस
- बाळासाहेबांबद्दल राज ठाकरेंना किती आदर हे चव्हाट्यावर आले – शिवसेना
- “मला वातावरण गरम करायला दोन मिनिटंही लागणार नाहीत, पण…”