मुंबई: राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार दिल्लीत गेले असून ते विरोधी पक्षाच्या विविध नेत्यांना भेटणार आहेत. आजारपणानंतर पवार दिल्लीत गेलेच नव्हते. मध्यंतरी दोन वेळा त्यांनी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना डॉक्टरांनी प्रवास न करण्याचा सल्ला दिला होता. प्रकृती व्यवस्थित झाल्याने त्यांनी लांबवलेली दिल्ली भेट आता केली आहे. यातून कोणतेही वेगळे राजकीय अर्थ काढू नये, असे पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितले.
हे पण वाचा: नाशिकमध्ये आज मराठा मूक आंदोलन, थोड्याच वेळात खासदार संभाजीराजे आंदोलनस्थळी दाखल
हे पण वाचा: स्वबळाची भाषा करणे म्हणजे, पक्षाचा आत्मघात करून घेणे; काँग्रेसच्या मंत्र्यांची पक्ष प्रभारींकडे तक्रार
मुख्यमंत्री ठाकरे यांची दिल्ली भेट, नंतर शिवसेनेचे आ. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहिलेले पत्र, या पार्श्वभूमीवर पवार यांच्या भेटीचे राजकीय अर्थ काढणे सुरू झाले. त्यावर मलिक म्हणाले की, याचा कोणताही राजकीय संदर्भ नाही. पक्षाचे नेते पूर्वनियोजित कार्यक्रमात व्यस्त आहेत. उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याच्या दौर्यावर तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पूर्वनियोजित कार्यक्रमात व्यस्त आहेत.
हे पण वाचा: मराठा आरक्षणाबाबत फेरविचार याचिका; ५४ मुद्द्यांचा आधार घेत पाटील पुन्हा सर्वाेच्च न्यायालयात
हे पण वाचा: “जर जेलमध्ये जायचं नसेल तर भाजपसमोर गुडघे टेका’’ निलेश राणेची शिवसेनेवर खोचक टीका
तसेच काही दिवसांपुर्वी प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मुंबईत येऊन शरद पवार यांची सिल्वर ओकवर भेट घेतली होती. त्यांच्यात तब्बल ३ तास चर्चा झाली होती. या बैठकीचा प्रमुख विषय दिल्ली दरबार होता, असं सांगितलं गेलं होतं. प्रशांत किशोर यांच्याकडे राष्ट्रवादीच्या कॅम्पेनची किंवा इतर कोणतीही जबाबदारी देण्यात आली नाही. मात्र भाजपविरोधात आघाडी निर्माण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ, असं राष्ट्रवादीनं स्पष्ट केलं होतं.