मुंबई : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणा ईडीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या मैदानात लेटरबॉम्ब टाकला आहे. यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होण्याचे सूतोवाच केले जात असून, त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, शिवसेना कमकुवत करत असल्याचा खळबळजनक दावा केला असून, भाजपसोबत जुळवून घेण्याचा सल्ला, त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
हे पण वाचा, पाच वर्ष सरकार भक्कम; आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – नाना पटोले
दरम्यान, यावर आता भाजप नेते आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले असून, “आमदार प्रताप सरनाईक यांनी लिहलेले पत्र, हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांनी पत्रात लिहिल्याप्रमाणे युती व्हावी, अशी अनेकांची इच्छा असेल; मात्र आम्ही आता वेगळे होऊन काम करत आहोत. सध्या तरी आमच्यासमोर राज्यातील जनतेचे प्रश्न आहेत, आणि ते सोडवण्याला आमचे प्राधान्य आहे. आम्ही एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतोय. त्यामुळे, येत्या काळात आम्ही बहुमताने सत्तेत येऊ,” असं वक्तव्य त्यांनी केले आहे.
हे पण वाचा, “स्वबळाची भाषा करण्याआधी एकदा पायाखालची जमीन तपासून घ्या”- संजय राऊत
तसेच, ‘‘सरनाईक यांच्या पत्रावरून सुरु झालेली चर्चा, शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्याप्रमाणे इतर काही जणांचीही तशी भूमिका असू शकते. मात्र, आम्ही भाजप, विरोधी पक्ष म्हणून चांगले काम करत आहोत. जबाबदारी ओळखून काम करत आहोत, ती पार पाडत आहोत. आम्ही जनतेचे प्रश्न मांडत राहू आणि पुन्हा स्वबळावर सत्तेत येऊ, सध्याच्या राजकीय परिस्थितीत कुणी कुणाला जोडे मारायचे कुणी कुणाला हार घालायचे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यावर आपण बोलू शकत नाही.’’ असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीला फटकारले आहे.
Read Also :
- बाळासाहेबांबद्दल राज ठाकरेंना किती आदर हे चव्हाट्यावर आले – शिवसेना
- “मला वातावरण गरम करायला दोन मिनिटंही लागणार नाहीत, पण…”
- “ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा”
- …शरद पवारांच्या राजकारणाचा अस्त होतोय; गोपीचंद पडळकरांचा दावा
- “प्रताप सरनाईकांबद्दल आम्हाला सहानुभूती, त्यांच्या पत्रातून त्यांचा छळ होत आहे.”