मुंबई : गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, “काँग्रेस येत्या काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका स्वबळावर लढणार,” असा नारा देत आहेत. दरम्यान, त्यांचीच री नंतर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनीही ओढली आणि “काँग्रेसला आता स्वबळावर लढण्याची गरज आहे. या आघाडी सरकारमध्ये काँग्रेस तिसराच पक्ष आहे,” अशी खंत बोलून दाखवली. यावरून राज्यात आघाडीत लवकरच बिघाडी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
हे पण वाचा, …शरद पवारांच्या राजकारणाचा अस्त होतोय; गोपीचंद पडळकरांचा दावा
दरम्यान, यावरून शिवसेनेने आपल्या सामनाच्या आग्रलेखातून भाष्य करत शिवसेनेला सल्ला दिला आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युती होती तेव्हाही शतप्रतिशत भाजप हा कार्यक्रम राबवला गेलाच होता. स्वबळाचे दांडपट्टे तेव्हाही फिरवले गेले. त्यामुळे एखाद्या पक्षाने स्वबळाची भाषा करणं हे काही चुकीचं नाही. फक्त पायाखालची जमीन एकदा तपासून घेतली पाहिजे, असा टोला सेनेनं काँग्रेसला लगावला.
हे पण वाचा, प्रशांत किशोर- शरद पवार यांच्यात खलबतं सुरु, राज्यात लवकरच राजकीय वादळ?
शनिवारी शिवसेनेच्या वर्धानपण दिनी, राहुल गांधी यांचाही वाढदिवस होता. यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात, प्रदेश काँग्रेसकडून पुन्हा स्वबळाची गर्जना केली गेली. यात नाना पाटोळे आणि भाई जगताप यांना, पृथ्वीराज चव्हाणांची देखील साथ मिळाली. यावर, “या भक्कम युतीमुळे महाराष्ट्रात काँग्रेस क्रमांक एकचा पक्ष होणार असेल तर त्यांच्या आत्मविश्वासाला गालबोट लावण्याचा प्रयत्न कोणी करू नये,” असा चिंता काँग्रेसला सामानातून काढला आहे.
हे पण वाचा,
तसेच, “चव्हाण काँग्रेसचे मुख्यमंत्री असताना, जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सलग १५ वर्षे सत्तेत असणाऱ्या सरकारला घरी बसवले आणि फडणवीसांचे राज्य आले. त्यामुळे चव्हाण यांना आता काँग्रेस पक्षाची बांधणी, पुन्हा नव्या जोमाने करावी लागणार,” अशी खोचक टीकाही शिवसेनेनं आपल्या मुखपत्रातून केली आहे.
Read Also :
- “ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा”
- “प्रताप सरनाईकांबद्दल आम्हाला सहानुभूती, त्यांच्या पत्रातून त्यांचा छळ होत आहे.”
- “राष्ट्रवादी व काँग्रेसने, मोठ्या मनाने शिवसेनेला सांभाळून घेतलंय, त्यांच्या हे लक्षात असावं”
- युती होऊ शकते, मात्र आता निर्णय शिवसेनेनं घ्यायचा आहे- गिरीश बापट
- स्वबळाची भाषा करणे म्हणजे, पक्षाचा आत्मघात करून घेणे; काँग्रेसच्या मंत्र्यांची पक्ष प्रभारींकडे तक्रार