नवी दिल्ली : शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुप्त भेटीनंतर आणि काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर, राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. यानंतर आता, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची गेल्या ४० मिनिटांपासून दिल्लीत बैठक सुरू आहे. गेल्या १० दिवसांत या दोघांची ही दुसरी भेट असल्याने, देशभरात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, याचा सर्वात जास्त धसका राज्याच्या राजकारणानं घेतला असून, त्यामुळे राज्यातल्या राजकीय घडामोडींना देखील वेग आला आहे.
हे पण वाचा, शरद पवार दिल्लीला रवाना, विरोधी पक्षाच्या नेत्यांना भेटणार; राजकीय वर्तुळात चर्चेला उधान
दरम्यान, शस्त्रक्रियेनंतर गेल्या काही दिवसांपासून पवारांनी, आपल्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी विश्रांती घेतली. त्यानंतर आता ते थेट दिल्लीत दाखल झाले असून, २३ जूनपर्यंत ते राजधानीत असणार आहेत. यावेळी, देशातील राजकीय स्थितीवर, तसेच आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, भाजपविरोधात विरोधकांची एक मोट बांधण्याच्या दृष्टीने काही हालचाली करण्यासाठी आणि रणनीती आखण्यासंबंधी, ते विरोधी पक्षातील नेत्यांची भेट घेऊन, त्यांच्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे. याच अनुषंगाने किशोर यांची ही भेट होत असून, पवारांच्या घरी ही बैठक सुरू आहे.
हे पण वाचा, महाविकास आघाडीला ठरवायचं, कोणासोबत युती करायची? का एकमेकांवर चपला फेकायच्या
काही दिवसांपूर्वी प्रशांत किशोर यांनी मुंबईत शरद पवारांची घरी जाऊन भेट घेतली होती. ही सदिच्छा भेट असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला होता. मात्र, तब्बल 3 तासही बैठक सुरू होती. या बैठकीत देशासह, राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, प्रशांत किशोर यांच्यासोबत, राज्यात रणनीती आखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहमती दर्शवली असून, राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत कशा पद्धतीने नियोजन करावे, काय समीकरण आखले जावे, मतदारसंघनिहाय कसे नियोजन असावे, याबद्दलही किशोर यांनी भाष्य केले.
हे पण वाचा, “जर जेलमध्ये जायचं नसेल तर भाजपसमोर गुडघे टेका’’ निलेश राणेची शिवसेनेवर खोचक टीका
दुरसीकडे, २४ च्या निवडणुका अजून लांब असल्या तरी, त्याची आत्तापासून राष्ट्रवादीने सुरुवात केली आहे. याचाच एक भाग प्रशांत किशोर असल्याचे सांगितले जात आहे. त्यांच्या मदतीने राष्ट्रवादी २०२४ च्या निवडणुकीत, आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याच्या प्रयत्नात असल्याचं बोललं जात आहे. मात्र, या भेटीनंतर, राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली होती, पण १० दिवसानंतर दोघांमध्ये पुन्हा बैठक होत असल्याने, या भेटीवरून तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.
Read Also :
- युती होऊ शकते, मात्र आता निर्णय शिवसेनेनं घ्यायचा आहे- गिरीश बापट
- बिलोली- देगलूर पोटनिवडणुकीत भाजप पुन्हा एकदा पंढरपूर पॅटर्न राबविणार
- आमचं शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं नाही; राऊतांचा भाजपवर पलटवार
- स्वबळाची भाषा करणे म्हणजे, पक्षाचा आत्मघात करून घेणे; काँग्रेसच्या मंत्र्यांची पक्ष प्रभारींकडे तक्रार
- मराठा आरक्षणाबाबत फेरविचार याचिका; ५४ मुद्द्यांचा आधार घेत पाटील पुन्हा सर्वाेच्च न्यायालयात