काँग्रेस नेतृत्वाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असताना राज्यातील अनेक नेत्यांकडून राहुल गांधी यांनी काँग्रेससह देशाचे नेतृत्व करावे अशी मागणी राज्यातील अनेक काँग्रेस नेत्यांकडून केली गेल्याचे पहायला मिळाले. राज्याच्या बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी देखील याबाबत ट्विटच्या माध्यमातून भाष्य केले आहे.
यशोमती ठाकूर यांच्या ट्विटची चर्चा सध्या जोरदार पद्धतीने सुरू आहे, आपल्या ट्विटमध्ये त्या म्हणतात, ‘गांधी इज नॉट अ फॅमिली, इट्स डीएनए ऑफ इंडिया.’ आता राहुलजींनी समोर यायला हवे.
Gandhi is not a ‘Family’ it’s ‘DNA of India’. If Soniyaji has made up her mind then Rahulji should lead the party. India Needs Rahul ji @INCIndia @RahulGandhi @priyankagandhi @kcvenugopalmp @SATAVRAJEEV @INCMaharashtra @bb_thorat pic.twitter.com/eiaDsirtS7
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) August 23, 2020
सोनिया गांधी यांनी आज सुरु झालेल्या एका बैठकीच्या सुरूवातीलाच काँग्रेस नेत्यांनी पाठवलेल्या पत्राला उत्तर देणारं पत्र कार्यसमितीकडे दिलं. त्याचबरोबर “आपल्याला हंगामी अध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावं”, अशी मागणीही त्यांनी बैठकीत केली. मात्र, पक्षाचं नेतृत्व करत राहावं, अशी विनंती डॉ. मनमोहन सिंग यांनी सोनिया गांधी यांना केली असल्याची माहिती सध्या पुढे आली आहे.
हे देखील वाचा
नेतृत्वावरून काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या वादाबाबत शिवसेना म्हणते. .https://t.co/KZpzvMMEOp#Shivsena #congrerss #PoliticalMaharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) August 24, 2020