पुणे : पहिल्यांदाच खासदार झालेल्या भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात नागरी उड्डाण व सहकार राज्यमंत्री पदाची लॉटरी लागली. त्यानंतर आज मुरलीधर मोहोळ यांचं पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात येत आहे. तर सायंकाळी भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी मुरलीधर मोहोळांनी राखीव वेळ ठेवला आहे. परंतु त्याआधीच लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या विजयाचे श्रेय घेण्याची लढाई भाजपच्या अंतर्गत राजकारणात सुरू असल्याचं दिसून येत आहे.
पुण्यात मिळवलेला ऐतिहासिक विजयानंतर आता कार्यकर्त्यांकडून विजयाचं श्रेय घेण्यास मुरलीधर मोहोळ यांचे फ्लेक्स बोर्ड, बॅनर्स आणि पोस्टर्स लावण्यास सुरूवात झाली आहे. यामध्ये भाजपचे माजी नगरसेवक आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तिकीटीसाठी इच्छूक असलेल्या विविध व्यक्तींचा समावेश असल्याचं दिसून येत आहे. जवळपास प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांच्याबाबत रिल आणि व्हिडीओ देखील व्हायरल केले जात आहे. त्यामुळे सध्या पुण्यात भाजप अंतर्गत राजकारणाला सुरूवात झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय.
हेही वाचा…“आता विधानसभेत विजय मिळाल्यानंतरच गळ्यात हार घालणार”, फडणवीसांनी विजयाचं घेतलं प्रण
विधानसभा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपचा २५ वर्षांचा बालेकिल्ला उद्धवस्त करत ऐतिहासिक विजय मिळवला. परंतु त्याच कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांना मोठं मताधिक्क मिळालं. आता यावरूनच विजयाचे दावे-प्रतिदावे भाजप अंतर्गत सुरू असल्याचे दिसून येत आहे. यासाठी अनेक भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या वैयक्तिक प्रयत्नांमुळे पक्षाला चांगले मत मिळाले असल्याचे दाखवण्यात आले आहे.
विशेषत : करून दिवंगत खासदार गिरीश बापट यांचे देखील फोटो या बॅनर्सवर झळकू लागले आहेत. यामुळे गिरीश बापट यांचे पुत्र गौरव बापट यांनी यावरून नाराजी व्यक्त केलीय. विजयाचे श्रेय कोणत्याही व्यक्तीला न देता सामूहिक प्रयत्नांना द्यायला हवे. असेही गौरव बापट यांनी म्हटलंय. तर गौरव बापट यांनी याबाबत एक पोस्ट लिहिली आहे. त्यात पुणे शहरातील सुजाण मतदारांनी भाजपवर विश्वास ठेवलाय.
हेही वाचा..“अपमान झाल्यानं नाशिक लोकसभेच्या निवडणूकीतून माघार घेतली”, भुजबळांचं मोठं विधान
मुरलीधर मोहोळ हे एक लाखाहून अधिक मतांनी खासदार झाले. तथापि, पुण्यातील भाजपचे काही नेते आणि व्यक्ती या विजयाचे श्रेय घेण्यासाठी स्पर्धा करताना पाहून निराशाजनक आहे की, त्यांच्या प्रयत्नांमुळेच हा विजय मिळाला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. एका विशिष्ट मतदारसंघात बहुमत एका व्यक्तीमुळे होते असा दावा करणे आणि त्याची मोठ्या प्रमाणावर जाहिरात करणे अयोग्य आहे.” असेही त्यांनी म्हटलंय.
मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींच्या गटाला लक्ष्य करू इच्छित नाही. मी माझ्या शब्दांवर ठाम आहे. माझ्या भावना व्यक्त करण्यासाठी ही पोस्ट शेअर करण्यात आली होती आणि याचा अर्थ कोणत्याही व्यक्तीला दुखावण्याचा किंवा लक्ष्य करण्याचा नव्हता. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी लोकांच्या आशा-आकांक्षेशी त्याचा काहीही संबंध नाही. देण्यासाठी मी पोस्ट लिहिली आहे. यासाठी पात्र असलेल्या सर्वांचे श्रेय आहे. असेही ते म्हणाले.
भाजपचे शहर विभाग प्रमुख धीरज घाटे म्हणाले की, पक्षाने नेहमीच कार्यकर्त्यांच्या योगदानाची दखल घेतली आहे. आम्ही पुण्याच्या लोकसभा विजयाचे श्रेय सामूहिक प्रयत्नांना दिले. असा विजय हा अनेक वर्षांच्या प्रयत्नांचे आणि समर्पणाचे परिणाम आहे. पक्षाचे विचार आणि तत्त्वे अनुयायांना आम्हाला मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करतात.
READ ALSO :
हेही वाचा…गजा मारणे अन् निलेश लंके भेट, अजित पवार गटाने डिवचलं, म्हणाले..
हेही वाचा..एनडीए आघाडीमध्ये लवकरच भूकंप होणार ? काही खासदार भाजपला धक्का देण्याच्या तयारीत
हेही वाचा..“बारामतीत झालेल्या पराभावासाठी मला चिंतन करण्याची काहीही गरज नाही”
हेही वाचा…अजित पवारांच्या अडचणी वाढल्या? अण्णा हजारे देणार क्लोजर रिपोर्टला कोर्टात आव्हान