मुंबई : राज्यात मागील काही काळापासून भारतीय जनता पक्षाने राज्यातील धार्मिक स्थळं उघडण्यासाठी जोरदार मोहीम चालवली होती. अगदी वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम ने ही राज्यातील मंदिरं उघडण्यासाठी आंदोलने केली होती.
पण एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या विरोधाला महाविकास आघाडी सरकारने बिलकुल न जुमानता मंदीरं उघडण्याची परवानगी दिली नाही. पण आता दिवाळीनंतर राज्यातील मंदिरं उघडण्यासाठीची परवानगी देण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसलेंनीसुद्धा मंदीरं उघडण्यासाठी थेट राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची भेट घेतली होती. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात रंगलेल्या वादाचंसुद्धा ‘मंदीरं उघडण्यासाठी परवानगी’ हे एक महत्त्वाचं कारण होतं.
महाराष्ट्रात वेळोवेळी भाजप, वंचित, MIM सारख्या पक्षांनी धार्मिक स्थळं उघडण्यासाठी आंदोलने केली. पण आता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या या विधानामुळे या मागणीचा जोर कमी होण्याची शक्यता आहे.
Read Also :
मंत्री हसन मुश्रीफांचा ‘तो’ दावा म्हणजे गावगप्पा, भाजपचं जोरदार प्रत्युत्तरhttps://t.co/n7bxeFHef5 @Madhavbhandari_ @mrhasanmushrif @BJP4Maharashtra @NCPspeaks @Avadhutwaghbjp @sachin_inc
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) November 2, 2020